शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.

जितेंद्र दखणे अमरावतीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो यासाठी मागील महिन्यापासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच क्षणापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. साहजिकच राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही बंधने आली. ती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे सर्वजण या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घतली जात आहे. ग्रामीण भागात आदर्श आचारसंहितेची सखोल माहिती नसल्याने विविध कार्यक्रमांत जावे की नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहेबांना येता येते का? याची चौकशी कार्यकर्ते करीत आहेत. या कालावधीत उमेदवार नेत्यासह सर्वच मोठ्या नेत्यावर आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नजर असते. नेते मंडळीसुध्दा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याअगोदर खातरजमा करुनच कार्यक्रमास सहभागी होताना दिसत आहेत. एरवी राजकीय नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याने वागणारे अधिकारीही कारवाईच्या धास्तीने या लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिक गोची राजकीय पक्षांशी निगडित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची होत आहे. बऱ्याच निवडणुकीत शिक्षक संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यांना मात्र एकीकडे आयोगाची धास्ती, दुसरीकडे साहेबांच्या परीक्षेच्या वेळीच त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. आजही ग्रामीण भागात गुरुजींचा शब्द प्रमाण मानला जातो. पण आदर्श आचारसंहितेमुळे शासकीय सेवेत असणाऱ्या गुरुजींची मोठी अडचण होताना दिसत आहे.