शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.

जितेंद्र दखणे अमरावतीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो यासाठी मागील महिन्यापासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच क्षणापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. साहजिकच राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही बंधने आली. ती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे सर्वजण या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घतली जात आहे. ग्रामीण भागात आदर्श आचारसंहितेची सखोल माहिती नसल्याने विविध कार्यक्रमांत जावे की नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहेबांना येता येते का? याची चौकशी कार्यकर्ते करीत आहेत. या कालावधीत उमेदवार नेत्यासह सर्वच मोठ्या नेत्यावर आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नजर असते. नेते मंडळीसुध्दा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याअगोदर खातरजमा करुनच कार्यक्रमास सहभागी होताना दिसत आहेत. एरवी राजकीय नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याने वागणारे अधिकारीही कारवाईच्या धास्तीने या लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिक गोची राजकीय पक्षांशी निगडित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची होत आहे. बऱ्याच निवडणुकीत शिक्षक संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यांना मात्र एकीकडे आयोगाची धास्ती, दुसरीकडे साहेबांच्या परीक्षेच्या वेळीच त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. आजही ग्रामीण भागात गुरुजींचा शब्द प्रमाण मानला जातो. पण आदर्श आचारसंहितेमुळे शासकीय सेवेत असणाऱ्या गुरुजींची मोठी अडचण होताना दिसत आहे.