शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

शाळेत गुरुजींची २५ टक्केदेखील हजेरी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

काही शाळांमध्ये कागदावरच शिक्षकांची कामे, ऑनलाईन शिक्षणाबाबत तक्रारी अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने ...

काही शाळांमध्ये कागदावरच शिक्षकांची कामे, ऑनलाईन शिक्षणाबाबत तक्रारी

अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. मात्र, शासनाने शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी काही शाळांमध्ये शिक्षकांची हजेरी कागदोपत्रीच होती. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने गुरुजींचे चांगभलं असे चित्र आहे.

कोरोनाकाळात शिक्षण ‘लॉक’ आहे. आता तरी शाळा सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मध्यंतरी महसूल खात्याने शिक्षकांची वेगवेगळ्या जबाबदारी हाताळण्यासाठी कर्तव्यावर नेमणूक केली होती. दरम्यान वाईन शॉपीवरही गुरुजींची नोंदणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता. महसूल, पोलिसांच्या मदतीसाठी शिक्षकांची नियुक्ती झाली होती. मात्र, असे असले तरी ७० टक्के गुरुजींनी कोरोना काळात बसूनच वेतन घेतले, असे वास्तव आहे. ना ऑनलाईन शिकवणी, ना ऑनलाईन अभ्यासक्रम असा सुखद काळ काही शिक्षकांचा गेला, यात दुमत नाही.

---------------------

जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक

प्राथमिक शाळा : १९४९

माध्यमिक शाळा : ७४४

--------

प्राथमिक शिक्षक : ५२२५

माध्यमिक शिक्षक : ३४५०

-----------------------

तालुकानिहाय उपस्थिती

प्राथमिक माध्यमिक

अचलपूर : १६४ ७२

अमरावती : १२४ ४८

अंजनगाव सुर्जी : १२० ४९

भातकुली : ११६ ३५

चांदूर बाजार : १२९ ५३

चिखलदरा : १७१ ३७

चांदूर रेल्वे : ७४ २३

दर्यापूर : १४९ ५९

धारणी : १७३ ३३

धामणगाव रेल्वे : ९१ ३०

मोर्शी : ११५ ४९

नांदगाव खंडेश्र्वर : १२८ ३५

तिवसा : १०७ २६

वरुड : १२७ ५६

अमरावती महापालिका : ६३ १४०

----------------

शिक्षक काय म्हणतात?

‘‘ कोरोनाकाळातही शाळा सुरूच होती. ऑनलाईन शिक्षक अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे लागले. केवळ कठोर संचारबंदीच्या काळातच शाळेत जाता आले नाही. एरव्ही शाळेचे कामकाज निरंतर होते.

- सुरेश माेलके, शिक्षक

----------

‘‘ शिक्षकांना पूर्णपणे आराम मिळाला असे म्हणता येणार नाही. ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे, अभ्यासातील अडचणी सोडविणे ही कामे करावीच लागली. विद्यार्थ्यांविना शाळा असल्या तरी अन्य कामांपासून शिक्षकांची सुटका नाही.

- वैशाली परतेकी, शिक्षिका.

-------------

कोरोना काळात शासन निर्देशानुसार मुख्याध्यापक अथवा एक शिक्षक शाळेत हजर राहत होते. ऑनलाईन शिक्षणाच्यावेळी विषय शिक्षकांना शाळेत अनिवार्य केले होते. शासन निर्देशाचे पालन करूनच गुरुजींना शाळेत बाेलावण्यात आले.

- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अमरावती.

--------