शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

गुजरातमध्ये कांद्याची निर्यात थंडावली, उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:41 IST

कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही.

ठळक मुद्देभाजीबाजारात कांदा, बटाट्याची आवक घटली : पावसाचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही. परिणामी स्थानिक कांदा उत्पादकांना फटका बसला असून, आता येणाºया काही महिन्यात भाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे मत कांदा विक्रेते व कृषी अभ्यासक सतीश कावरे यांनी व्यक्त केले.गेल्या आठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे, कांदा, लसूण व इतर पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उचलत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अमरावती फळ व भाजीबाजारात पांढरा बटाटा हा आग्रा, सिसागंज (उ.प्र.) येथून येत असून, त्याची नेहमीपेक्षा आवक व उचल ४० टक्क्यापर्यंत कमी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आलू ला १२००ते १४०० रुपये क्विंटलमागे भाव मिळत आहे, तर कांद्या हा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून येत आहे.लसूण इंदूर, निमच, कोटा या ठिकाणावरून अमरावतीत दाखल होत असून, त्याला बाजार समितीत १८०० ते २२०० क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, या सर्व भाजीपाल्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक मागणी असते. एप्रिल ते जून दरम्यान एकही ट्रक गुजरात राज्यात गेला नाही. पुढील महिन्यात कर्नाटक व मध्य प्रदेशचा कांदा निघणार असून, तो अमरावती येथे दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याला यानंतर चांगला भाव मिळू शकणार नसल्याचा अंदाज हा कावरे यांनी व्यक्त केला आहे.दरवर्षी गुजरात राज्यात अमरावतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण, गेल्या तीन महिन्यांत एक ट्रक ही कांदा गुजरात राज्यात गेला नाही. त्या कारणाने आता आवकही कमी झाली व भावसुद्धा चांगला मिळण्याची शक्यता नाही- सतीश कावरे,कांदा व्यापारीआठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे व इतर भाजीपाल्याची आवक कमी आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून उचल नसल्याने भाव कमी आहे.चंदीराम आहुजा, ठोक विक्रेतागेल्या काही आठवड्यापासून आवक कमी झाल्याने सेससुद्धा कमी मिळत आहे. पंधरा ते वीस हजारांचा सेस आता आठ ते दहा हजार प्रतिदिनावर आला आहे- आर. पी. वानखडेविभागप्रमुख,फळ व भाजीबाजार