शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये कांद्याची निर्यात थंडावली, उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:41 IST

कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही.

ठळक मुद्देभाजीबाजारात कांदा, बटाट्याची आवक घटली : पावसाचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही. परिणामी स्थानिक कांदा उत्पादकांना फटका बसला असून, आता येणाºया काही महिन्यात भाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे मत कांदा विक्रेते व कृषी अभ्यासक सतीश कावरे यांनी व्यक्त केले.गेल्या आठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे, कांदा, लसूण व इतर पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उचलत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अमरावती फळ व भाजीबाजारात पांढरा बटाटा हा आग्रा, सिसागंज (उ.प्र.) येथून येत असून, त्याची नेहमीपेक्षा आवक व उचल ४० टक्क्यापर्यंत कमी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आलू ला १२००ते १४०० रुपये क्विंटलमागे भाव मिळत आहे, तर कांद्या हा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून येत आहे.लसूण इंदूर, निमच, कोटा या ठिकाणावरून अमरावतीत दाखल होत असून, त्याला बाजार समितीत १८०० ते २२०० क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, या सर्व भाजीपाल्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक मागणी असते. एप्रिल ते जून दरम्यान एकही ट्रक गुजरात राज्यात गेला नाही. पुढील महिन्यात कर्नाटक व मध्य प्रदेशचा कांदा निघणार असून, तो अमरावती येथे दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याला यानंतर चांगला भाव मिळू शकणार नसल्याचा अंदाज हा कावरे यांनी व्यक्त केला आहे.दरवर्षी गुजरात राज्यात अमरावतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण, गेल्या तीन महिन्यांत एक ट्रक ही कांदा गुजरात राज्यात गेला नाही. त्या कारणाने आता आवकही कमी झाली व भावसुद्धा चांगला मिळण्याची शक्यता नाही- सतीश कावरे,कांदा व्यापारीआठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे व इतर भाजीपाल्याची आवक कमी आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून उचल नसल्याने भाव कमी आहे.चंदीराम आहुजा, ठोक विक्रेतागेल्या काही आठवड्यापासून आवक कमी झाल्याने सेससुद्धा कमी मिळत आहे. पंधरा ते वीस हजारांचा सेस आता आठ ते दहा हजार प्रतिदिनावर आला आहे- आर. पी. वानखडेविभागप्रमुख,फळ व भाजीबाजार