शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला.

बाजार समितीची पाहणी : व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा

चांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला. पहली भेट त्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली. याप्रसंगी बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा शेतमालाची गारपीट व वादळी पावसाने झालेली वाताहात पाहून पालकमंत्र्याचा राग अनावर झाला. त्यांनी हर्रासाच्या ठिकाणीच बाजार समितीचा गलथान कारभार बघून सचिवांची झाडाझडती घेतली. बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या ८००० पोती विक्रीकरिता होती. यात गहू, तूर, हरभरा, सोयाबीन, आदी मालाचा समावेश होता. अचानक आलेल्या गारपीट व वादळी पावसामुळे यातील ६००० पोत्यांची नासाडी झाल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा माल पावसात भिजल्याने ते माल व्यापारीही खरेदी करण्यास तयार होत नाही. यावेळी बाजार समितीही शेतकऱ्यांचा पाठीशी राहत नसल्याचे निदर्शनास आले. जे व्यापारी ओला माल खरेदी करणार नाही त्याचे परवाने त्वरित रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री पोटे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांचा विक्रीस आलेल्या मालाला पावसापासून पूर्ण संरक्षण मिळेल, अशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे आदेश बाजार समिती सचिव मनीष भारंबे यांना दिले. ही व्यवस्था न झाल्यास कार्यवाहीस तयार रहा, अशी पालकमंत्र्यांनी तंबीही दिली. यानंतर पालकमंत्री जसापूर मार्गावरील श्रीराम भेले, आशिष कोरडे, बंड यांच्या शेतात पाहणी केली. त्यानंतर जसापूर मार्गे कोदोरी, दिलालपुर, माघाण, काजळी, देऊरवाडा, शिरजगाव कसबा या गावातील शेताची पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात. यावेळी प्रशांत चर्जन या शेतकऱ्यांने आपल्या शेतातील कांदा या पिकाचे नुकसानग्रस्त रोपटे पालकमंत्री यांना पाहणीकरीता आणले होते. याप्रसंगी पालकमंत्री पोटे, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी राजीव मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर सुने, दिनेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष अशोक बनसोड, शहर अध्यक्ष किशोर मेटे, कोरडे, बाळासाहेब सोनार उपस्थित होते. आमदारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथाआमदार बच्चू कडू यांनी गारपीट झाल्यानंतर ताबडतोब स्वत: बेलोरा, नानोरी, सोनोरी, बोरज, जसापुर, माधान, दिलालपुर, कारंजा बहिरम, शिरजगांव कसबा आदि गावांना भेटी देवून शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारीशी संपर्क साधून शेतकऱ्यांना तत्काल मदतीची मागणी केली. तालुक्यातील सर्वच गारपीट ग्रस्त गावांचा दौरा करुन शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे.