शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:32 IST

रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांनी डागली तोफ : बेलोरा विमानतळाचा रेंगाळलेला मुद्दा तापला

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे. विमानतळ विकासाचे वचन खोटारडेपणाचे आहे. समृद्धी महामार्गासाठी ४३ हजार कोटी रुपये आहेत आणि विमानतळासाठी तीन वर्षांपासून ७५ कोटी उपलब्ध होऊ नये, हे न समजण्याजोगी जनता खुळी नाही, असा थेट वार जगताप यांनी ना. प्रवीण पोटे यांच्यावर केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते.बेलोरा विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी स्वत: चालविणार आणि विकासासाठी दोन टप्प्यांत ७५ कोटी देणार, असा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतला. शासन या निर्णयाचे श्रेय घेवू इच्छित असल्याच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी तोफ डागली. गत वर्षभरापासून जळू ते बेलोरा वळण रस्ता (बायपास) करिता १५ कोटी निधी देऊ शकले नाही, ते ७५ कोटी काय देणार? सरकारचा हा निर्णय म्हणजे खोटारडेपणा होय. राज्यात भाजपचे सरकार असेपर्यंत बेलोरा विमानतळाचा विकास शक्य नाही. पुढील वर्षी बेलोरा विमानतळाहून छोटी विमाने सुरू करणे ही पालकमंत्र्यांची थाप होय, असा थेट आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळातच विमानतळ विकासाला जमीन मिळवून दिली आणि काँग्रेसचे सरकारच येत्या काळात विमाने सुरू करेल, असा टोला आ. जगताप यांनी लगावला. विमानतळ विकासासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या बैठकी जगतापांनी निरर्थक ठरविल्यात. माझ्या मते, पालकमंत्री प्रभावशून्य आहे. वर्षभरात ते बेलोरा विमानतळाचा वळण रस्ता निर्माण करू शकले नाही; आता विमानांचे उड्डाण होईल, हे कुणालाही पटणारे नाही, असा आसूड त्यांनी ओढला. विमानतळ विस्तारीकरणात बडनेरा ते यवतमाळ मार्ग बंद होणार होते. मी स्वत: पुढाकार घेऊन पाच गावांच्या शेतकºयांची जमीन मिळवून दिली. मात्र, बायपासचे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे बेलोरा विमानतळाहून येत्या सहा ते आठ महिन्यांत मोठी विमाने ‘टेक आॅफ’ घेतील, हा पालकमंत्र्याचा दावा तद्दन खोटा आहे. आताही विमानतळावर छोटी विमाने दिवसाच उतरतात. विमानतळाची धावपट्टी १३७२ मीटरवरून १८५० मीटर लांब होणे भाजप सरकारच्या काळात शक्यच नाही. ते काँग्रेस सरकारच करू शकेल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थापा मारणे बंद कराव्यात. शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असा सल्ला आ. जगतापांनी दिला.जिल्हयाची खऱ्या अर्थाने विकासाकडे झेप - पालकमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. केंद्रीय मार्ग निधी व बांधकाम विभागाकडून सुरू झालेल्या रस्ते निर्मितीमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. बेलोरा विमानतळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्यांनी निर्णय घेऊन बेलोरा विमानतळ विकासाचा शब्द पाळला. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमुळे बेलोरा विमानतळावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असेल व अमरावती हवाईमार्गाने जोडले जाणार असल्याने औद्योगिक वसाहतीत अधिकाधिक उद्योग येऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. इतर शहरांप्रमाणेच आता बेलोरा विमानतळावरून लवकरच विमानांची ये-जा सुरू होऊन अमरावतीच्या विकासात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

विमानतळाला मिळाले ७५ कोटीडिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’: मुख्यमंत्र्यांची अमरावतीकरांना नववर्षाची भेट

गुरुवार, १४ डिसेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेलोरा विमानतळाचा विकास महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून करण्यास मान्यता प्रदान आली तसेच ७५ कोटी रुपये हे दोन टप्प्यांत दिले जाणार असून, १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने ही नववर्षाची भेट दिली, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलबेलोरा विमानतळावरून डिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’ होईल. यासंदर्भात २१ नोव्हेंबर रोजी ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतरच खºया अर्थाने विमानतळाच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रारंभी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून बेलोरा विमानतळ विकसित केले जाणार होते. काही तांत्रिक कारणांमुळे आता महाराष्ट्र शासनाने बेलोरा विमानतळ स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची विशेष प्रकल्प वाहक (ये-जा) म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीला प्रस्ताव देण्यात आला आहे.बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळ विकासासाठी ७५ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. यात विमानतळ हाताळण्याच्या क्षमतेची टर्मिनल इमारत उभारणे, फायर स्टेशन व एटीसी टॉवर, अप्रन (एपीआरओएन) क्षमतेत वाढ करणे, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्ता, रस्त्यालगतच्या विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ यांना जोडणाºया चौपदरी रस्त्याचे काम, विमानतळास पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांनी विमानतळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.