शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:32 IST

रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांनी डागली तोफ : बेलोरा विमानतळाचा रेंगाळलेला मुद्दा तापला

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे. विमानतळ विकासाचे वचन खोटारडेपणाचे आहे. समृद्धी महामार्गासाठी ४३ हजार कोटी रुपये आहेत आणि विमानतळासाठी तीन वर्षांपासून ७५ कोटी उपलब्ध होऊ नये, हे न समजण्याजोगी जनता खुळी नाही, असा थेट वार जगताप यांनी ना. प्रवीण पोटे यांच्यावर केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते.बेलोरा विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी स्वत: चालविणार आणि विकासासाठी दोन टप्प्यांत ७५ कोटी देणार, असा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतला. शासन या निर्णयाचे श्रेय घेवू इच्छित असल्याच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी तोफ डागली. गत वर्षभरापासून जळू ते बेलोरा वळण रस्ता (बायपास) करिता १५ कोटी निधी देऊ शकले नाही, ते ७५ कोटी काय देणार? सरकारचा हा निर्णय म्हणजे खोटारडेपणा होय. राज्यात भाजपचे सरकार असेपर्यंत बेलोरा विमानतळाचा विकास शक्य नाही. पुढील वर्षी बेलोरा विमानतळाहून छोटी विमाने सुरू करणे ही पालकमंत्र्यांची थाप होय, असा थेट आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळातच विमानतळ विकासाला जमीन मिळवून दिली आणि काँग्रेसचे सरकारच येत्या काळात विमाने सुरू करेल, असा टोला आ. जगताप यांनी लगावला. विमानतळ विकासासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या बैठकी जगतापांनी निरर्थक ठरविल्यात. माझ्या मते, पालकमंत्री प्रभावशून्य आहे. वर्षभरात ते बेलोरा विमानतळाचा वळण रस्ता निर्माण करू शकले नाही; आता विमानांचे उड्डाण होईल, हे कुणालाही पटणारे नाही, असा आसूड त्यांनी ओढला. विमानतळ विस्तारीकरणात बडनेरा ते यवतमाळ मार्ग बंद होणार होते. मी स्वत: पुढाकार घेऊन पाच गावांच्या शेतकºयांची जमीन मिळवून दिली. मात्र, बायपासचे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे बेलोरा विमानतळाहून येत्या सहा ते आठ महिन्यांत मोठी विमाने ‘टेक आॅफ’ घेतील, हा पालकमंत्र्याचा दावा तद्दन खोटा आहे. आताही विमानतळावर छोटी विमाने दिवसाच उतरतात. विमानतळाची धावपट्टी १३७२ मीटरवरून १८५० मीटर लांब होणे भाजप सरकारच्या काळात शक्यच नाही. ते काँग्रेस सरकारच करू शकेल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थापा मारणे बंद कराव्यात. शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असा सल्ला आ. जगतापांनी दिला.जिल्हयाची खऱ्या अर्थाने विकासाकडे झेप - पालकमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. केंद्रीय मार्ग निधी व बांधकाम विभागाकडून सुरू झालेल्या रस्ते निर्मितीमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. बेलोरा विमानतळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्यांनी निर्णय घेऊन बेलोरा विमानतळ विकासाचा शब्द पाळला. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमुळे बेलोरा विमानतळावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असेल व अमरावती हवाईमार्गाने जोडले जाणार असल्याने औद्योगिक वसाहतीत अधिकाधिक उद्योग येऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. इतर शहरांप्रमाणेच आता बेलोरा विमानतळावरून लवकरच विमानांची ये-जा सुरू होऊन अमरावतीच्या विकासात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

विमानतळाला मिळाले ७५ कोटीडिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’: मुख्यमंत्र्यांची अमरावतीकरांना नववर्षाची भेट

गुरुवार, १४ डिसेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेलोरा विमानतळाचा विकास महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून करण्यास मान्यता प्रदान आली तसेच ७५ कोटी रुपये हे दोन टप्प्यांत दिले जाणार असून, १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने ही नववर्षाची भेट दिली, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलबेलोरा विमानतळावरून डिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’ होईल. यासंदर्भात २१ नोव्हेंबर रोजी ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतरच खºया अर्थाने विमानतळाच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रारंभी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून बेलोरा विमानतळ विकसित केले जाणार होते. काही तांत्रिक कारणांमुळे आता महाराष्ट्र शासनाने बेलोरा विमानतळ स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची विशेष प्रकल्प वाहक (ये-जा) म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीला प्रस्ताव देण्यात आला आहे.बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळ विकासासाठी ७५ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. यात विमानतळ हाताळण्याच्या क्षमतेची टर्मिनल इमारत उभारणे, फायर स्टेशन व एटीसी टॉवर, अप्रन (एपीआरओएन) क्षमतेत वाढ करणे, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्ता, रस्त्यालगतच्या विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ यांना जोडणाºया चौपदरी रस्त्याचे काम, विमानतळास पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांनी विमानतळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.