शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वाढोणा झाले जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

चारशे हेक्टरातील बियाणे गेले वाहून धामणगाव रेल्वे : पावसाळ्याच्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या वाढोणा शिवारात गुरुवारी ...

चारशे हेक्टरातील बियाणे गेले वाहून

धामणगाव रेल्वे : पावसाळ्याच्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या वाढोणा शिवारात गुरुवारी कोसळलेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने जलसागर निर्माण केला. तब्बल चारशे हेक्टरमध्ये पेरलेले बियाणे पूर्णतः वाहून गेले.

तालुक्यातील दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वाढोणा येथे मान्सूनच्या पहिल्या पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या गावाचा इतिहास पाहता, येथे शंभर टक्के मान्सूनपूर्व पेरणी होते. १ जूनपासून सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांची पेरणी केली. मात्र, गुरुवारी वाढोणा हे गाव पावसाने पूर्णत: जलमय झाले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पेरलेले बियाणे पूर्णतः वाहून गेले.

वाढोणा ग्रामपंचायतीचे शिल्पकार पंकज गायकवाड यांनी स्वतः गावात पोहोचून शेताची पाहणी केली. समृद्धी प्रकल्पामुळे सर्वाधिक शेतजमिनीचे नुकसान झाले. शेंदूरजना खुर्द येथील शेतकरी संदीप रहाटे आणि इतर शेतकऱ्यांचे पावसामुळे आणि मोती कोळसा नदीला आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी केली आहे.