शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

हमीभावात वाढ, खासगीत मात्र लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:15 IST

केंद्राने यंदाच्या हंगामासाठी हमीभाव जाहीर केले असले तरी एकाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने विकला जात नाही. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकला जाऊ नये, यासाठी १९ मार्च २०११ च्या परिपत्रकान्वये सर्वच बाजार समित्यांना पणन संचालकांचे निर्देश आहेत. मात्र, यामधूनही ९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रकाचा पर्याय काढत शेतमाल नॉन एफएक्यू प्रतवारीत खरेदी केल्या जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी केव्हा? : हमीदर मिळण्यासाठी यंत्रणाच सक्षम करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्राने यंदाच्या हंगामासाठी हमीभाव जाहीर केले असले तरी एकाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने विकला जात नाही. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकला जाऊ नये, यासाठी १९ मार्च २०११ च्या परिपत्रकान्वये सर्वच बाजार समित्यांना पणन संचालकांचे निर्देश आहेत. मात्र, यामधूनही ९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रकाचा पर्याय काढत शेतमाल नॉन एफएक्यू प्रतवारीत खरेदी केल्या जात असल्याचे वास्तव आहे.शासनाने आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी केलीच नाही. या सर्व शेतकऱ्यांना आता बाजार समित्यांमध्ये माल विकल्याशिवाय पर्याय नाही. या शेतमालावर शासन प्रतिक्विंटल एक हजारांचे अनुदान देणार असले तरी हमीभावापेक्षा कमी दराने माल विकलाच जाऊ नये, यासाठी व्यापाºयांच्या मुसक्या आवळण्याचे धाडसच शासनाकडे नाही. बाजार समित्यांमध्ये गुरूवारी तूर ३,४५० ते ३,७५०, मूग ४,१०० ते ४,८००, उडीद २,१०० ते २,१००, हरभरा ३,१०० ते ३,१००, सोयाबीन ३१०० ते ३३०० या भावाने विकल्या गेले, किंबहुना या वर्षभरात शेतमालास बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमत मिळाली नाही. शेतकºयांची लूट होत असताना बाजार समिती व्यवस्थापनाद्वारा एकाही व्यापाऱ्यास अटकाव केला गेलेला नाही.९ नोव्हेंबरच्या निर्देशाकडे डोळेझाकसहकार विभागाच्या ९ नोव्हेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार शेतकरी जर हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची परवानगी देत असेल तर कलम ३२ (ड) नुसार खरेदी करता येते. मात्र यासाठी बाजार समित्यांद्वारा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकाकडे पाहिजे, त्यानंतरच परवानगी मिळते. यासाठी सहा. निबंधक, तालुका कृषी अधिकारी व बाजार समितीचे सचिव यांनी आवक शेतमाल नॉन एफएक्यू प्रमाणित केल्यानंतरच लिलावास परवानगी मिळते. मात्र, याचे कोणतेही निकष न पाळता सर्व बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा कमी भावाने शेतमालाची विक्री होत असल्याचे वास्तव आहे.१९ नोव्हेंबर २०११ च्या परिपत्रकाचे उल्लंघनबाजार समिती अधिनियम १९६३ व १९६७ मधील तरतुदीनुसार सोपविलेल्या जबाबदारीमध्ये हयगय झाल्यास संचालक मंडळ व सचिव जबाबदार राहील.बाजार समितीमध्ये शेतमालाचे वजन ईलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यानेच करणे अनिवार्य आहे. याला अधिनियम १९६३ चे कलम १२ (१) अन्वये मान्यता देण्यात आली आहे.बाजार समितीच्या आवारात शेतमालाची खरेदी-विक्री हमीभावापेक्षा कमी दराने होणार नाही. उल्लंघन झाल्यास संचालक मंडळ व सचिव जबाबदार धरले जातील.हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास बाजार समितीने तपासणी करून व्यापाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याबाबत कार्यवाही करावी व अहवाल डीडीआर यांना द्यावा.या परिपत्रकाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित बाजार समितीविरूद्ध अधिनियम १९६३ व १९६७ मधील तरतूदीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी कार्यवाही करावी.