शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तळणी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: February 14, 2016 00:25 IST

पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

भटकंती : उन्हाळ्यापूर्वीच पेटला गावात पाणीप्रश्नमोर्शी : पंचायत समितीमधील तळणी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने तात्पुरती व्यवस्था केलेली विहीर आटली असून मागील १० दिवसांपासून गावातील नळयोजना बंद आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन शेतातून टाकावी लागत असून उभ्या पिकांमुळे महिनाभरापासून काम प्रलंबित आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात पाणी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याचे समजते. मागील वर्षी नव्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यानंतर सदर योजनेचे काम होऊ शकले नव्हते. मागील वर्षीही तीव्र पाणी टंचाईचा सामना तळणीकरांना करावा लागला. प्रशासकीय मंजुरातीचे अनेक अडथळे पार केल्यानंतर योजनेचे काम जेमतेम सुरू झाले होते.पाण्याचे महत्त्व समजून तातडीने मंजुरात मिळणे गरजेचे होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला नसता. गावाला नवीन योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत नव्या विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव शासन दरबारात ग्रामपंचायतने सादर केला असून प्रस्ताव मंजूर होईपर्यंत नागरिकांची शेतातून पाणी आणण्यासाठी पायपिट सुरुच राहणार आहे. शेतीची मजुरीची कामे सोडून पाणी आणण्याचे काम नागरिक सध्या करत असून गावातील विहीरींचे, हातपंपाचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)