शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

भूजल पातळीत दीड मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:30 IST

गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेरचे निरीक्षण : अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरची घट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट प्रकारच्या कठीण पाषाणाचा आहे व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा सरासरी ३४ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजलाचे अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. उर्वरित पाणवहन क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.भूजलात सर्वाधिक कमी असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.अतिविकशित पाणलोट क्षेत्रात बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागातील भूजल साठा झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल असल्याची माहिती आहे.आता १,१३४ विहिरींद्वारे भूजलाची नोंदजिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप १,१३४ विहीरी प्रस्थापीत करण्यात आल्यात.जलस्वराज प्रकल्पातंर्गत आता जलसुलक्षक व ग्रामसेवकांवर विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. दर महिण्याला या विहिरींच्या भुजलाची नोंद ठेवल्या जाणार असल्याने भूजल मूल्यांकन त्वरेने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये नोंदीसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर होईल.भूजल घटनिहाय तालुका स्थितीजिल्ह्यात मार्चअखेर भूजल पातळीत सरासरी १.५० मीटरने कमी आली. यामध्ये सहा तालुक्यात ० ते एक मीटरपर्यत, पाच तालुक्यात एक ते दोन मीटरपर्यत, दोन तालुक्यात दोन ते तीन मीटरपर्यत तर एक तालुक्यात तीन मीटरपेक्षाअधिक भूजलात कमी आलेली आहे.