शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

भूजल पातळीत दीड मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:30 IST

गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेरचे निरीक्षण : अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरची घट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट प्रकारच्या कठीण पाषाणाचा आहे व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा सरासरी ३४ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजलाचे अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. उर्वरित पाणवहन क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.भूजलात सर्वाधिक कमी असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.अतिविकशित पाणलोट क्षेत्रात बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागातील भूजल साठा झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल असल्याची माहिती आहे.आता १,१३४ विहिरींद्वारे भूजलाची नोंदजिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप १,१३४ विहीरी प्रस्थापीत करण्यात आल्यात.जलस्वराज प्रकल्पातंर्गत आता जलसुलक्षक व ग्रामसेवकांवर विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. दर महिण्याला या विहिरींच्या भुजलाची नोंद ठेवल्या जाणार असल्याने भूजल मूल्यांकन त्वरेने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये नोंदीसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर होईल.भूजल घटनिहाय तालुका स्थितीजिल्ह्यात मार्चअखेर भूजल पातळीत सरासरी १.५० मीटरने कमी आली. यामध्ये सहा तालुक्यात ० ते एक मीटरपर्यत, पाच तालुक्यात एक ते दोन मीटरपर्यत, दोन तालुक्यात दोन ते तीन मीटरपर्यत तर एक तालुक्यात तीन मीटरपेक्षाअधिक भूजलात कमी आलेली आहे.