शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

भूजल पातळीत दीड मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:30 IST

गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेरचे निरीक्षण : अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरची घट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट प्रकारच्या कठीण पाषाणाचा आहे व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा सरासरी ३४ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजलाचे अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. उर्वरित पाणवहन क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.भूजलात सर्वाधिक कमी असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.अतिविकशित पाणलोट क्षेत्रात बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागातील भूजल साठा झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल असल्याची माहिती आहे.आता १,१३४ विहिरींद्वारे भूजलाची नोंदजिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप १,१३४ विहीरी प्रस्थापीत करण्यात आल्यात.जलस्वराज प्रकल्पातंर्गत आता जलसुलक्षक व ग्रामसेवकांवर विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. दर महिण्याला या विहिरींच्या भुजलाची नोंद ठेवल्या जाणार असल्याने भूजल मूल्यांकन त्वरेने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये नोंदीसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर होईल.भूजल घटनिहाय तालुका स्थितीजिल्ह्यात मार्चअखेर भूजल पातळीत सरासरी १.५० मीटरने कमी आली. यामध्ये सहा तालुक्यात ० ते एक मीटरपर्यत, पाच तालुक्यात एक ते दोन मीटरपर्यत, दोन तालुक्यात दोन ते तीन मीटरपर्यत तर एक तालुक्यात तीन मीटरपेक्षाअधिक भूजलात कमी आलेली आहे.