शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अमरावतीत ७२ आसनी विमानसेवेला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: July 3, 2016 23:59 IST

येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

अमरावती : येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीकरांना लवकरच विमान सेवेची संधी मिळणार आहे.केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा चमुने मे महिन्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करून येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणी केली होती. त्यानुसार चार सदस्यीय चमुने बेलोरा विमानतळाची पाहणी करून ७२ आसनी विमानसेवा (एटीआर) सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. मात्र, बेलोरा विमानतळाहून विमानाचे ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे राहील, असे या चमुने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाचा पाहणीवजा वस्तुनिष्ठ अहवाल एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिस्टंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन.के.गुप्ता यांनी राज्य शासन आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला सोपविला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी चमुच्या अहवालात बेलोरा विमानतळावर धावपट्टीची लांबी, विजेचे काम, एटीएस टॉवर, ‘रन-वे’वर लाईट, टर्मिनल इमारत, विमानतळ सीमेवर प्रकाश व्यवस्था, जळू ते बेलोरा वळण रस्ता आदी प्रस्तावित विकासकामे त्वरेने सुरूकरण्याचे सुचविले आहे. बेलोरा विमानतळाकडे २८३ हेक्टर जमीन असल्याने विस्तारिकरणात अडचण नाही. त्यामुळे येत्या काळात बेलोरा विमानतळाहून आंतरराज्यीय विमानसेवा सुरू करण्यास हरकत नाही. प्रस्तावित ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)धावपट्टीचा विस्तार : एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा राज्य शासनाला अहवालआॅगस्टपासून विमानतळावर कामे सुरू होतीलआॅगस्ट महिन्यापासून बेलोरा विमानतळावर विविध विकासकामांना प्रारंभ होईल, असे संकेत बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी.पाठक यांनी दिलेत. बेलोरा विमानतळावर हल्ली १८५० मीटर धावपट्टी असून प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी किमान २२०० मीटर धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्यानुसार २२०० मीटर धावपट्टी तयार करण्याचे देखील एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने प्रस्तावित केले आहे. विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यास एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने होकार दर्शविला आहे. काही जमीन संपादित केली जाणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे हे संकेत आहेत.- एम.पी.पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ