शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ७२ आसनी विमानसेवेला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: July 3, 2016 23:59 IST

येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

अमरावती : येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीकरांना लवकरच विमान सेवेची संधी मिळणार आहे.केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा चमुने मे महिन्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करून येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणी केली होती. त्यानुसार चार सदस्यीय चमुने बेलोरा विमानतळाची पाहणी करून ७२ आसनी विमानसेवा (एटीआर) सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. मात्र, बेलोरा विमानतळाहून विमानाचे ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे राहील, असे या चमुने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाचा पाहणीवजा वस्तुनिष्ठ अहवाल एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिस्टंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन.के.गुप्ता यांनी राज्य शासन आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला सोपविला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी चमुच्या अहवालात बेलोरा विमानतळावर धावपट्टीची लांबी, विजेचे काम, एटीएस टॉवर, ‘रन-वे’वर लाईट, टर्मिनल इमारत, विमानतळ सीमेवर प्रकाश व्यवस्था, जळू ते बेलोरा वळण रस्ता आदी प्रस्तावित विकासकामे त्वरेने सुरूकरण्याचे सुचविले आहे. बेलोरा विमानतळाकडे २८३ हेक्टर जमीन असल्याने विस्तारिकरणात अडचण नाही. त्यामुळे येत्या काळात बेलोरा विमानतळाहून आंतरराज्यीय विमानसेवा सुरू करण्यास हरकत नाही. प्रस्तावित ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)धावपट्टीचा विस्तार : एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा राज्य शासनाला अहवालआॅगस्टपासून विमानतळावर कामे सुरू होतीलआॅगस्ट महिन्यापासून बेलोरा विमानतळावर विविध विकासकामांना प्रारंभ होईल, असे संकेत बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी.पाठक यांनी दिलेत. बेलोरा विमानतळावर हल्ली १८५० मीटर धावपट्टी असून प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी किमान २२०० मीटर धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्यानुसार २२०० मीटर धावपट्टी तयार करण्याचे देखील एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने प्रस्तावित केले आहे. विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यास एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने होकार दर्शविला आहे. काही जमीन संपादित केली जाणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे हे संकेत आहेत.- एम.पी.पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ