शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या मिरचीची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:33 IST

तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले, बाजारपेठ पारंपरिकच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरचीची रात्री भरणारी बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या दहा वर्षांत नवीन वाणांमुळे मिरची अधिक तिखट आणि जादा उत्पादन देणारी ठरली आहे. मिरचीएवढी रोख रक्कम अन्य पिके देऊ शकत नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळला आहे. आता एकरी २५ ते ४० क्विंटल तोडा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे किमान एकरभराचे क्षेत्र किमान पाच एकरावर गेले आहे. या अतिरिक्त मालाच्या तुलनेत राजुराबाजार येथील मिरचीची व्यापारी पेठ कमी पडत असल्याचे दिसून येते. एक किलो मिरची तोडून ती विकण्यासाठी १० रुपयांपर्यंत खर्च येतो. तथापि, बाजारात कधी क्विंटलला हजार, तर कधी ६०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा पीक घेण्यासाठी रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते. त्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. क्विंटलमागे दोन हजारांवर मिरचीला किंमत आणि रेल्वेसारख्या वेगवान मालवाहतुकीची आवश्यकता व्यक्त होत आहे.मिरचीचे तोडे थांबलेनवीन वाण अधिक तिखट असल्याने वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यानी मिरचीचे तोडे थांबवले आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर मिरचीचे दर वाढत होते. मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उलंगवाडी झाल्याने भाववाढीची अपेक्षा फोल ठरणार आहे.रेल्वे लाईनची मागणीमालवाहतुकीच्या साधनांची उपलब्धता पाहून व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. सध्या राजुराबाजार येथून रस्त्यानेच मालवाहतूक होऊ शकते. ती व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकºयांकडे मिरची साठल्याचे दिसून येते. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाला जोडणारा रेल्वे मार्ग येथे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मिरचीच्या नवनवीन वाणामुळे उत्पादन वाढले. त्यानुसार खर्चदेखील वाढला आहे. दोन ते अडीच हजारांपर्यंत भाव मिळाल्यास मिरची विकणे परवडणारे होऊ शकते. यासाठी सक्षम बाजारपेठ हवी आहे.- गणेश गावंडे, शेतकरी, तळणी, ता. मोर्शीप्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषिमालासाठी शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.- गोवर्धन दापूरकर, शेतकरी, अमडापूर, ता. वरूड