शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

हिरव्या मिरचीची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:33 IST

तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले, बाजारपेठ पारंपरिकच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरचीची रात्री भरणारी बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या दहा वर्षांत नवीन वाणांमुळे मिरची अधिक तिखट आणि जादा उत्पादन देणारी ठरली आहे. मिरचीएवढी रोख रक्कम अन्य पिके देऊ शकत नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळला आहे. आता एकरी २५ ते ४० क्विंटल तोडा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे किमान एकरभराचे क्षेत्र किमान पाच एकरावर गेले आहे. या अतिरिक्त मालाच्या तुलनेत राजुराबाजार येथील मिरचीची व्यापारी पेठ कमी पडत असल्याचे दिसून येते. एक किलो मिरची तोडून ती विकण्यासाठी १० रुपयांपर्यंत खर्च येतो. तथापि, बाजारात कधी क्विंटलला हजार, तर कधी ६०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा पीक घेण्यासाठी रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते. त्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. क्विंटलमागे दोन हजारांवर मिरचीला किंमत आणि रेल्वेसारख्या वेगवान मालवाहतुकीची आवश्यकता व्यक्त होत आहे.मिरचीचे तोडे थांबलेनवीन वाण अधिक तिखट असल्याने वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यानी मिरचीचे तोडे थांबवले आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर मिरचीचे दर वाढत होते. मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उलंगवाडी झाल्याने भाववाढीची अपेक्षा फोल ठरणार आहे.रेल्वे लाईनची मागणीमालवाहतुकीच्या साधनांची उपलब्धता पाहून व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. सध्या राजुराबाजार येथून रस्त्यानेच मालवाहतूक होऊ शकते. ती व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकºयांकडे मिरची साठल्याचे दिसून येते. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाला जोडणारा रेल्वे मार्ग येथे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मिरचीच्या नवनवीन वाणामुळे उत्पादन वाढले. त्यानुसार खर्चदेखील वाढला आहे. दोन ते अडीच हजारांपर्यंत भाव मिळाल्यास मिरची विकणे परवडणारे होऊ शकते. यासाठी सक्षम बाजारपेठ हवी आहे.- गणेश गावंडे, शेतकरी, तळणी, ता. मोर्शीप्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषिमालासाठी शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.- गोवर्धन दापूरकर, शेतकरी, अमडापूर, ता. वरूड