शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

हिरव्या मिरचीची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:33 IST

तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले, बाजारपेठ पारंपरिकच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरचीची रात्री भरणारी बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. अलीकडच्या दहा वर्षांत नवीन वाणांमुळे मिरची अधिक तिखट आणि जादा उत्पादन देणारी ठरली आहे. मिरचीएवढी रोख रक्कम अन्य पिके देऊ शकत नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळला आहे. आता एकरी २५ ते ४० क्विंटल तोडा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे किमान एकरभराचे क्षेत्र किमान पाच एकरावर गेले आहे. या अतिरिक्त मालाच्या तुलनेत राजुराबाजार येथील मिरचीची व्यापारी पेठ कमी पडत असल्याचे दिसून येते. एक किलो मिरची तोडून ती विकण्यासाठी १० रुपयांपर्यंत खर्च येतो. तथापि, बाजारात कधी क्विंटलला हजार, तर कधी ६०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे तोडण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा पीक घेण्यासाठी रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते. त्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. क्विंटलमागे दोन हजारांवर मिरचीला किंमत आणि रेल्वेसारख्या वेगवान मालवाहतुकीची आवश्यकता व्यक्त होत आहे.मिरचीचे तोडे थांबलेनवीन वाण अधिक तिखट असल्याने वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याची वाट पाहत शेतकऱ्यानी मिरचीचे तोडे थांबवले आहेत. दरवर्षी जानेवारीनंतर मिरचीचे दर वाढत होते. मात्र, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उलंगवाडी झाल्याने भाववाढीची अपेक्षा फोल ठरणार आहे.रेल्वे लाईनची मागणीमालवाहतुकीच्या साधनांची उपलब्धता पाहून व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतात. सध्या राजुराबाजार येथून रस्त्यानेच मालवाहतूक होऊ शकते. ती व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकºयांकडे मिरची साठल्याचे दिसून येते. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गाला जोडणारा रेल्वे मार्ग येथे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मिरचीच्या नवनवीन वाणामुळे उत्पादन वाढले. त्यानुसार खर्चदेखील वाढला आहे. दोन ते अडीच हजारांपर्यंत भाव मिळाल्यास मिरची विकणे परवडणारे होऊ शकते. यासाठी सक्षम बाजारपेठ हवी आहे.- गणेश गावंडे, शेतकरी, तळणी, ता. मोर्शीप्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे गरजेचे आहे. कृषिमालासाठी शीतगृहाची निर्मिती शासनाने करावी.- गोवर्धन दापूरकर, शेतकरी, अमडापूर, ता. वरूड