शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला मूग, उडीद, ज्वारीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्दे३० हजार हेक्टरने क्षेत्रवाढ अपेक्षित : बियाण्यांचा तुटवडा आल्यास संभाव्य उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास सोयाबीनला मूग, उडीद व ज्वारीचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय आंतरपीकदेखील घेता येऊ शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दाणा बारीक झाला व उत्पादनातदेखील घट आलेली असल्याने यंदाच्या हंगामात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता नसल्यास वा किमतीमध्येही वाढ झाल्याने एखाद्या शेतकऱ्याला अडचण आल्यास अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मूग, उडीद व ज्वारीची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करता येऊ शकते. ज्वारीमध्ये मूग व उडदाचे आंतरपीक घेता येते तसेच ज्वारीला भावदेखील आहे. कडब्याला मागणी व अधिक दर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.नांदगावमध्ये सर्वाधिक, वरुडमध्ये किमान क्षेत्रसोयाबीनसाठी २ लाख ६८ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर ४६ हजार २००, अमरावती ३२ हजार ५००, चांदूर रेल्वे २६ हजार, भातकुली २५ हजार, चांदूर बाजार २२ हजार ८००, तिवसा २१ हजार, धामणगाव रेल्वे १८ हजार ५००, मोर्शी १८ हजार २००, दर्यापूर १२ हजार ८००, अचलपूर १२ हजार ७००, चिखलदरा ११ हजार ५००, अंजनगाव सुर्जी ११ हजार, धारणी ९ हजार ३०० व वरूड तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यात येणार आहे.असे आहे ज्वारीचे व्यवस्थापनखरीप ज्वारीची पेरणी साधारणपणे २५ जून ते १५ जुलै या दरम्यान करता येते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव होतो. पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित वाणाचे बियाणे वापरावे. पेरणी तिफणद्वारे दोन चाळ्यांच्या पाभरीने करावी व दोन ओळींमध्ये ४५ सेंमी अंतर असावे. पहिली विरळणी १० ते १२ व दुसरी २० ते २२ दिवसांनी करावी. ज्वारी रासायनिक खताला चांगला प्रतिसाद देत असल्याने कृषितज्ज्ञांच्या सल्याने खतांची मात्रा द्यावी. ज्वारीमध्ये मूग, उडीद व तुरीचे आंतरपीकदेखील घेता येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.सोयाबीन क्षेत्रवाढीची शक्यता असली तरी शेतकरी घरचे बियाणे प्रक्रियेद्वारे वापरत असल्याने तुटवडा भासणार नाही. सोयाबीनला ज्वारी, मूग व उडीद तसेच आंतरपीक हा पर्याय उपलब्ध आहे.- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती