शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राजापेठ उड्डाणपूल भूसंपादनाला मंत्रालयाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:25 IST

राजापेठ उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादनास नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक ६.६४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी हिरवी झेंडी दिली. भूसंपादनास असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर या प्रशासकीय मान्यतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देटीडीआर घेण्याची मुभा : महापालिकेच्या जबाबदारीवर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादनास नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक ६.६४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी हिरवी झेंडी दिली. भूसंपादनास असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर या प्रशासकीय मान्यतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत उड्डाणपुलाच्या भूसंपादनास महापालिकेने मान्यता मागितली होती. त्यानुसार भूसंपादनास लागणाऱ्या ६.६४ कोटींपैकी ४.६४ कोटी राज्यशासन तर १.९९ कोटी रुपये महापालिकेला स्वहिस्सा म्हणून द्यावा लागेल. राजापेठ उड्डाणपूलही रेल्वे प्राधिकरणाची वैधानिक जबाबदारी नसल्याने जागा संपादित करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे नगरविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.उड्डाणपुलासाठी बेलपुराकडे उतरणाºया पोचमार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध आहे. कंवरनगर व बेलपुराकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलासाठी भूसंपादन आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालयाकडे आक्षेप नोंदविण्यात आले. मात्र, भूसंपादनाशिवाय उड्डाणपुलाचे संपूर्ण काम शक्य नसल्याची बाब पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आली. जागेचे संपादन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली.हो... जबाबदारी आमचीच!नागरी क्षेत्रातील रेल्वे उड्डाणपूल आरओबीच्या कामाच्या अनुषंगाने रेल्वे प्राधिकरणाची वैधानिक जबाबदारी नसलेल्या जागा संपादित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. महापालिका आयुक्तांनी ती जबाबदारी प्रमाणित केल्याचे नगरविकास मंत्रालयाने म्हटले आहे. भूसंपादनासाठी निधी कोणी उभारायचा, यावरून रेल्वे व महापालिका यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. ते संपुष्टात आले आहे....तर विकास आराखड्यात बदलउड्डाणपुलासाठी त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांनी टीडीआर देऊन सदर जागा भूसंपादित करणे व त्यासाठी आवश्यक तेथे विकास आराखड्यात बदल करणे आवश्यक आहे. टीडीआर वा डीपीत बदल करूनही जागा संपादित करणे शक्य नसल्यास अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रमाणित करणे आवश्यक करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या धोरणानुसार, उड्डाणपुलासाठी भूसंपादन, भूसंपादनासाठी द्यावयाच्या मोबदल्याची परिगणना करताना ती राज्य शासनाच्या भूसंपादनातील दरानुसार करण्यात आल्याची खातरजमा महापालिका आयुक्तांना करावी लागेल.