शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

१९९१ च्या महापुराच्या आठवणी अजूनही ताज्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:12 IST

मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात.

ठळक मुद्देमोवाड : २७ वर्षांनंतरही आप्तांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा होतात ओल्या

गजानन नानोटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात.मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील मोवाड हे वर्धा नदीच्या तीरावरील गाव. १९९१ मध्ये ३० जुलैच्या मध्यरात्री एकाएकी मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला महापूर आला आणि हजारो लोकांना जलसमाधी मिळाली. घरे नेस्तनाबूत झाली. साहित्य पाण्यात वाहून गेले. बँका, सरकारी कार्यालयेसुद्धा कागदपत्रासह स्वाहा झाली होती. मृतदेहांचा सडा पडलेला होता. यात आई, बहिणी, बाप, मुलगा, भावकीतील आपला कोण, याचा शोध आणि आक्रोश सर्वत्र होता.मोवाड वगळता अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या वरूड तालुक्यालासुद्धा महापुराचा फटका बसला. वरूड, गणेशपूर, पुसला, लिंगा, आमनेर, मोर्शी (खुर्द) पोरगव्हाण, देऊतवाडा, घोराड, एकदरासह या नदीतीरावरील अनेक गावांचे गायरान झाले. यातून वाचलेल्यांना दरवर्षी जुलै महिन्यात धडकी भरते. आक्रोश, जीव वाचविण्याची धडपड आणि आप्तांच्या शोधासाठी पायपीट सर्व डोळ्यांपुढे तरळून जाते.ती काळरात्र अजूनही अंगावर शहारे आणते. अंगावर असलेले कपडे घेऊनच वाट मिळेल तिकडे लोक धावत होते. आम्हीसुद्धा आमच्या परीने होईल ती मदत मोवाडवासीयांना पोहचवून माणुसकीचा संदेश दिला होता.- रमेश श्रीराव,माजी सरपंच, पुसला