शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानातून कर्जकपात; शासनाचे चौकशीचे आदेश

By admin | Updated: December 11, 2014 22:59 IST

तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी

अमरावती : तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रकार मांडला. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या निषिध्द प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. पालवाडी येथील आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्याच्या वारसांना दिलासा देण्याकरिता ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ३० हजार रुपयांचा धनादेश मृताच्या वारसांना देण्यात आला. या अनुदानातून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तिवसा शाखेने कर्जकपात केली. याविषयीचे वृत्त 'लोकमत'मध्ये गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध होताच अनेक संघटनांनी या प्रकराचा निषेध केला. विधिमंडळात सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या चर्चेवर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात गुरुवारचा ‘लोकमत’चा अंक पुराव्यादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशी व तातडीने कारवाईचे आश्वासन सभागृहाला दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या या धोरणाचा निषेध केला. त्यांनी तहसीलदार विजय लोखंडे यांना निवेदन देऊन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी कृषिमंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली व या शेतकरी परिवारासह त्यांचे कर्जकपातीचे पैसे परत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. भावनाशून्य व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे शासन योजनेचे मातेरे होत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील यशोदा देवेंद्र कांबळे(३८) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ आॅगस्ट २०१४ रोजी घडली. मृत महिलेच्या नावे अडीच एकर शेत आहे. त्यांनी मे महिन्यात ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पेरणी केलेले बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीन उगवलेच नाही. दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. कसं जगावं, या विवंचनेत या महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली. प्रकरण निकषपात्र असल्याने या महिलेच्या वारसास ७० हजाराचा बाँड व ३० हजारांचा धनादेश मंगळवार ९ डिसेंबर रोजी देण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळ घोषित असताना व सक्तीने कर्ज वसुली करु नये, असे शासनाचे आदेश असताना तिवसा एसबीआय शाखेद्वारा अनुदानाच्या राशीमधून कर्जकपात करण्यात आल्याच्या या निंदणीय प्रकाराविषयी सर्वस्तरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)