शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अनुदानातून कर्जकपात; शासनाचे चौकशीचे आदेश

By admin | Updated: December 11, 2014 22:59 IST

तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी

अमरावती : तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रकार मांडला. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या निषिध्द प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. पालवाडी येथील आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्याच्या वारसांना दिलासा देण्याकरिता ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ३० हजार रुपयांचा धनादेश मृताच्या वारसांना देण्यात आला. या अनुदानातून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तिवसा शाखेने कर्जकपात केली. याविषयीचे वृत्त 'लोकमत'मध्ये गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध होताच अनेक संघटनांनी या प्रकराचा निषेध केला. विधिमंडळात सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या चर्चेवर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात गुरुवारचा ‘लोकमत’चा अंक पुराव्यादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशी व तातडीने कारवाईचे आश्वासन सभागृहाला दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या या धोरणाचा निषेध केला. त्यांनी तहसीलदार विजय लोखंडे यांना निवेदन देऊन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी कृषिमंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली व या शेतकरी परिवारासह त्यांचे कर्जकपातीचे पैसे परत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. भावनाशून्य व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे शासन योजनेचे मातेरे होत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील यशोदा देवेंद्र कांबळे(३८) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ आॅगस्ट २०१४ रोजी घडली. मृत महिलेच्या नावे अडीच एकर शेत आहे. त्यांनी मे महिन्यात ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पेरणी केलेले बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीन उगवलेच नाही. दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. कसं जगावं, या विवंचनेत या महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली. प्रकरण निकषपात्र असल्याने या महिलेच्या वारसास ७० हजाराचा बाँड व ३० हजारांचा धनादेश मंगळवार ९ डिसेंबर रोजी देण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळ घोषित असताना व सक्तीने कर्ज वसुली करु नये, असे शासनाचे आदेश असताना तिवसा एसबीआय शाखेद्वारा अनुदानाच्या राशीमधून कर्जकपात करण्यात आल्याच्या या निंदणीय प्रकाराविषयी सर्वस्तरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)