शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी मिळणार अनुदान

By admin | Updated: June 29, 2014 23:43 IST

शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला

अमरावती : शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता शासनाने मागील वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत किमान गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना मागील चार वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या अनेक गावे समृद्ध होऊन विकास कामांना निधी मिळणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत गटविकासमार्फत अर्ज पाठविले. यामध्ये राज्यातील चार हजारांवर ग्रामपंचायती लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत. या योजनेंतर्गत निकष पूर्ण ग्रामपंचायतींना गावाच्या लोकसंख्येच्या आधारे विकास निधी देण्यात येतो. तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी लावलेली झाडे दरवर्षी जिवंत ठेवल्यास त्यांना दरवर्षी निधी देण्यात येणार आहे. शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा, तालुका ते स्थानिक स्तर पोहचविण्यापर्यंत शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च होतो. शासन अनेक योजना राबवीत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध उपक्रमात सक्रियतेने भाग घेणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती यांसह अनेक योजनेत सहभाग घेतल्यास गावांचा विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. (प्रतिनिधी)