शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी मिळणार अनुदान

By admin | Updated: June 29, 2014 23:43 IST

शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला

अमरावती : शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता शासनाने मागील वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत किमान गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना मागील चार वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या अनेक गावे समृद्ध होऊन विकास कामांना निधी मिळणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत गटविकासमार्फत अर्ज पाठविले. यामध्ये राज्यातील चार हजारांवर ग्रामपंचायती लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत. या योजनेंतर्गत निकष पूर्ण ग्रामपंचायतींना गावाच्या लोकसंख्येच्या आधारे विकास निधी देण्यात येतो. तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी लावलेली झाडे दरवर्षी जिवंत ठेवल्यास त्यांना दरवर्षी निधी देण्यात येणार आहे. शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा, तालुका ते स्थानिक स्तर पोहचविण्यापर्यंत शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च होतो. शासन अनेक योजना राबवीत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध उपक्रमात सक्रियतेने भाग घेणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती यांसह अनेक योजनेत सहभाग घेतल्यास गावांचा विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. (प्रतिनिधी)