शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी मिळणार अनुदान

By admin | Updated: June 29, 2014 23:43 IST

शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला

अमरावती : शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता शासनाने मागील वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत किमान गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना मागील चार वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या अनेक गावे समृद्ध होऊन विकास कामांना निधी मिळणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत गटविकासमार्फत अर्ज पाठविले. यामध्ये राज्यातील चार हजारांवर ग्रामपंचायती लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत. या योजनेंतर्गत निकष पूर्ण ग्रामपंचायतींना गावाच्या लोकसंख्येच्या आधारे विकास निधी देण्यात येतो. तिसऱ्या वर्षाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी लावलेली झाडे दरवर्षी जिवंत ठेवल्यास त्यांना दरवर्षी निधी देण्यात येणार आहे. शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा, तालुका ते स्थानिक स्तर पोहचविण्यापर्यंत शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च होतो. शासन अनेक योजना राबवीत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध उपक्रमात सक्रियतेने भाग घेणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती यांसह अनेक योजनेत सहभाग घेतल्यास गावांचा विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. (प्रतिनिधी)