शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खरीप नुकसानीपोटी मिळणार अनुदान

By admin | Updated: January 15, 2015 22:44 IST

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन

अमरावती : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन स्तरावरून जिरायती, बागायती व फळबागधारक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांची गावनिहाय व बँकनिहाय यादी तयार करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. शासनस्तरावरून नुकसान झालेल्या जिरायत, बागायत व फळबागधारकांना अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी बैठकीत विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांना जलदगतीने मदत वाटप करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखून त्याचे नियोजन करावे, शेतकऱ्यांच्या गावनिहाय व बँकनिहाय यादी तयार करून अनुदान वाटपासाठी तहसील स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अनुदान वाटपासाठी गावस्तरावर मंडळ अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांची परीविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. तहसीलदारांनी स्वत: शेतकऱ्यांच्या सातबारा व आठ ‘अ’नुसार अचूक यादी तयार करून घेत त्याची तपासणी करून खातरजमा करावी व यादी अचूक असल्याचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत अहवाल कार्यालयास सादर करण्याचेही आदेशित केले आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठीचे अनुदान आयुक्तस्तरावरून उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)