शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आजीच्या दशक्रियेला गेलेल्या दोन नातवांचा बुडून मृत्यू (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

साखळी नदीपात्रातील पाईपमध्ये अडकले, नातेवाइकांचा खटाटोप व्यर्थ मंगरूळ चव्हाळा (अमरावती) : आजीच्या दशक्रिया विधीसाठी खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) ...

साखळी नदीपात्रातील पाईपमध्ये अडकले, नातेवाइकांचा खटाटोप व्यर्थ

मंगरूळ चव्हाळा (अमरावती) : आजीच्या दशक्रिया विधीसाठी खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथून मंगरूळ चव्हाळानजीक साखळी नदीतीरी गेलेल्या दोन नातवांचा पात्रात टाकलेल्या पाईपमध्ये अडकून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाइकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

मनीष दिलीप टोनपे (२३) व ईश्वर रामराव टोनपे (२५, दोघेही रा. खानापूर गवळी) अशी मृतांची नावे आहेत. मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावात ममताबाई टोनपे (७५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दशक्रिया विधीकरिता शनिवारी कुटुंबीय गावापासून आठ किमी अंतरावरील मौजे अजुर्नपूर येथील साखळी नदीकाठी ऋषी महाराज मंदिरात गेले होते. या साख‌ळी नदीवर निम्न साखळी हे धरण बांधले आहे. या नदीचे पात्र पार करण्यासाठी काही अंतरावर पायली टाकण्यात आली आहे. बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी नदीपात्रातून वाहत आहे. त्यामुळे धरणाखाली नदीपात्रात भोवरा तयार झाला आहे. नदीकाठी आलेले मनीष व ईश्वर यांनी पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, प्रवाह तीव्र असल्याने ते पुलाच्या सात फुटांच्या गोल पायलीत अडकले. हे लक्षात येताच पूजेला बसलेल्या भाऊ, वडील व नातेवाइकांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी २० मिनिटांपर्यंत केलेले प्रयत्न फोल ठरले. दोघांचे पाय पायलीत घट्ट फसल्याने त्यांना पाण्याच्या वर येता आले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूचे दु:ख शमलेले नसताना रामराव टोनपे व दिलीप टोनपे यांना मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन करावे लागले. याप्रकरणी त्यांनी धरणाच्या अर्धवट बांधणीमुळे ही घटना घडल्याचा आक्रोश व्यक्त केला.

सहायक पोलीस निरीक्षक पडघान यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कार्यवाही सुरू होती.