शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ग्रामसेवक आंदोलनावर, बुधवारी निघणार तोडगा

By admin | Updated: July 12, 2014 23:27 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील २७ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार आहे. मागील आठ दिवसांपासून 'ग्रेड पे'

धामणगांव रेल्वे : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील २७ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार आहे. मागील आठ दिवसांपासून 'ग्रेड पे' वाढविणारी फाईल राज्याच्या अर्थ विभागात अडकली आहे़राज्यात २७ हजार ९२७ ग्रामपंचायती आहेत़ ग्रामसेवकांमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची कामे ८० टक्के पूर्ण झाली़ ग्रामस्वच्छता अभियानापासून तर पर्यावरण ग्रामसमृध्दी योजना असे सर्व अभियान पूर्ण झाल्याने राज्य सतत पहिल्या क्रमांकावर आहे़ परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. त्यामुळे या ग्रामसेवकांनी मागील आठ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले़ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर झाली नाही, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा शासनाने शब्द फिरविला आहे़ कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून अद्यापही ग्राह्य धरला नाही़ २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करणे अशा अनेक मागण्या धूळ खात पडल्या होत्या. त्यामुळे कामबंद आंदोलनाचे हत्यार हाती घेतले असल्याचे युनियनचे अध्यक्ष कमलाकर वनवे यांनी सांगितले़