शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दीड वर्षानंतर होणार ८२३ ग्रामपंचायतीत ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

अमरावती: जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायती पैकी ८२३ ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षानंतर ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य कार्यकारी ...

अमरावती: जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायती पैकी ८२३ ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षानंतर ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला आहे. मात्र १६ ग्रामपंचायत मध्ये कोरोनाचा संसर्ग कायम असल्यामुळे या ठिकाणी ग्रामसभा होणार नसल्याचेही प्रशासनाने काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. ग्रामसभा घेतांना मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे बंधनकारक आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचा फटका ग्रामसभा नाही बसला होता. परिणामी जवळपास दीड वर्षापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या.त्यामुळे ग्रामपातळीवरील प्रश्नही रखडले होते. अशातच आता कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाली आहे.परिणामी रुग्णांची संख्याही एक अंकी आकडयावर आली आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी पवनित कौर यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ८३९ पैकी ८२३ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचा निर्णय जारी केला आहे. यानुसार पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना लेखी सूचना देवून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये १६ ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

बॉक्स

येथे नाही होणार ग्रामसभा

अमरावती तालुक्यातील टेंभा व माहुली जहागीर, वरूड मधील सुरळी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा,मुऱ्हा,कुंभारगाव, अचलपूर मधील गोरगांव ,चमक, चांदुर रेल्वेतील राजना, मांजरखेड, चांदूर बाजार मधील शिरजगाव, धारणीतील दिया, चक्रापूर ,दूनी, तिवसा सार्सी, नांदगाव खंडेश्वर मधील दाभा आदी ग्रामपंचायतीत ग्रामसभा कोरोनाच्या संसर्गामुळे होणार नाहीत.

कोट

ग्रामसभेचे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मतदार सभासद आहेत.दिडवर्षानंतर ग्रामसभा होणार असल्याने उपस्थिती मोठी राहू शकते.कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे नियम कसे पाळावेत हा खरा प्रश्न आहे.कारण यात अनेक अडचणी ग्रा.प.मध्ये आहेत.

कमलाकर वनवे

जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन

जिल्हा शाखा

कोट

ज्या गावात कोरोनाचा संसर्ग कायम आहे .अशा १६ ग्रामपंचायती वगळता ८२३ ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे त्यानुसार बीडीओ मार्फत संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत.

अविशांत पंडा

मुख्य कार्यकारी अधिकारी