शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ग्रामपंचायतींनाही केआरए

By admin | Updated: March 6, 2017 00:10 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही आता की रिझल्ट एरिया (केआरए) होणार आहे.

शासनाचे उद्दिष्ट : उत्पन्न वाढल्यास राज्य शासनाकडून परफॉर्मन्स निधीअमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही आता की रिझल्ट एरिया (केआरए) होणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मुदतीच्या आत नियोजनपूर्वक विकासकामांवर खर्च करून उत्पन्नात वाढ करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून परफॉर्मन्स निधी देण्यात येणार आहे. मात्र उत्पन्नात वाढ केली नाही, तर संबंधित ग्रामपंचायतीचा निधी दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करणे तसेच निधीचा दिलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त अन्य बाबींसाठी वापर केल्यास पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून वसुलीची कारवाई होणार आहे.परफॉर्मन्स निधी मिळण्यास पात्र ठरण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायती लेखापरीक्षण पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सादर करावे लागणार आहे. यात मागील वर्षीपेक्षा उत्पन्नात वाढ झाली असल्यास त्या ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी मिळणार आहे. या निधीचे वाटप ग्रामपंचायतीतील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे होणार आहे. लेखापरीक्षणाला ८० गुण आणि ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना २० गुण देण्यात येणार आहे. त्यामध्ये १०० पैकी ८५ गुण मिळणाऱ्या ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी आणि लेखा परीक्षण हे सदोष असल्यास संबंधित ग्रामपंचायतींना मिळणारा परफॉर्मन्स निधी दुसऱ्या ग्रामपंचायती वर्ग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी निधी खर्च कसा करायचा यासाठी राज्य शासनाने काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्या कार्यक्रमांवर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)काय आहेत अटी ?परफॉर्मन्स निधी मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखापरीक्षण करावे लागणार आहे. या निधीचे वाटप ग्रामपंचायतीतील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे आहे. लेखापरीक्षणाला ८० गुण आणि ग्रमपंचायतींनी उत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना २० गुण देण्यात येणार आहेत. १०० पैकी ८५ गुण मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींना परफॉर्म निधी उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधी वितरित करण्यासाठी बीडीओंकडून ग्रामपंचायतींची नावे पंचायत विभागाने मागविली आहेत. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.- जे.एन. आभाळे, डेप्युटी सीईओ, पंचायत