शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका

By admin | Updated: March 11, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे.

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे दोष विरहीत व कमी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये शासनाच्यावतीने सर्व क्षेत्रामध्ये संगणक व इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारापासून राज्य शासनाच्या कामकाजापर्यंत या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे विविध कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून तसेच कमी वेळेमध्ये काम होत आहे. अशातच पैशाचीही बचत होत आहे. सर्वच विभागात या प्रणालीचा उपयोग वाढत असल्यामुळे कामकाजामध्येही सुलभता आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक व इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून घेतल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात होऊ घातलेल्या ५३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. विशिष्ट आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या नमुन्यामध्ये व निर्देशाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. याची प्रिन्ट काढून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यावर अधिकाऱ्यासमोर सही करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया किचकट स्वरुपाची असते. शासनाला यामध्ये मनुष्यबळ व पैसा अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ई-निवडणूक पद्धत महत्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळे वेळ वाचणार आहे. मात्र निवडणूक लढवू इच्छूकांना यासाठी गावखेड्यातून तालुका अथवा सुविधा असलेल्या ठिकाणी जावूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)