शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका

By admin | Updated: March 11, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे.

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे दोष विरहीत व कमी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये शासनाच्यावतीने सर्व क्षेत्रामध्ये संगणक व इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारापासून राज्य शासनाच्या कामकाजापर्यंत या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे विविध कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून तसेच कमी वेळेमध्ये काम होत आहे. अशातच पैशाचीही बचत होत आहे. सर्वच विभागात या प्रणालीचा उपयोग वाढत असल्यामुळे कामकाजामध्येही सुलभता आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक व इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून घेतल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात होऊ घातलेल्या ५३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. विशिष्ट आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या नमुन्यामध्ये व निर्देशाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. याची प्रिन्ट काढून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यावर अधिकाऱ्यासमोर सही करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया किचकट स्वरुपाची असते. शासनाला यामध्ये मनुष्यबळ व पैसा अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ई-निवडणूक पद्धत महत्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळे वेळ वाचणार आहे. मात्र निवडणूक लढवू इच्छूकांना यासाठी गावखेड्यातून तालुका अथवा सुविधा असलेल्या ठिकाणी जावूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)