शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका

By admin | Updated: March 11, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे.

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे दोष विरहीत व कमी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये शासनाच्यावतीने सर्व क्षेत्रामध्ये संगणक व इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारापासून राज्य शासनाच्या कामकाजापर्यंत या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे विविध कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून तसेच कमी वेळेमध्ये काम होत आहे. अशातच पैशाचीही बचत होत आहे. सर्वच विभागात या प्रणालीचा उपयोग वाढत असल्यामुळे कामकाजामध्येही सुलभता आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक व इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून घेतल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात होऊ घातलेल्या ५३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. विशिष्ट आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या नमुन्यामध्ये व निर्देशाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. याची प्रिन्ट काढून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यावर अधिकाऱ्यासमोर सही करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया किचकट स्वरुपाची असते. शासनाला यामध्ये मनुष्यबळ व पैसा अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ई-निवडणूक पद्धत महत्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळे वेळ वाचणार आहे. मात्र निवडणूक लढवू इच्छूकांना यासाठी गावखेड्यातून तालुका अथवा सुविधा असलेल्या ठिकाणी जावूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)