शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

ग्रामपंचायत निवडणूक : 'कहीं खुशी, कहीं गम'

By admin | Updated: April 24, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली.

अमरावती : जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. अर्ध्या तासात ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर येऊ लागले, तसातसा तरुणाईचा जल्लोष वाढला. दुपारी ३ वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत काही ठिकाणी प्रस्थापितांना धूळ चारीत विरोधकांनी बाजी मारली, तर कुठे प्रस्थापित पॅनेलचा दबदबा कायम राहिला. समान मते मिळालेल्या जागांसाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या ही ग्रामपंचायत निवडणुकीत तिवसा तालुक्यात आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अनेक ठिकाणी काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले. स्थानिक पॅनेललाही अनेक ठिकाणी कौल मिळाला. सुरवाडी, कुऱ्हा, तळेगाव ठाकूर, शेंदूरजना बाजारसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तापालट झाली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात येवदा येथे विद्यमान सरपंच बाळासाहेब राऊत, प्रदीप देशमुख यांचे पॅनेल विजयी झाले. या तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित पॅनेलला मात देण्यात आली. माजी जि.प. सदस्य बळवंत वानखडे यांच्या पॅनेलने लेहेगावमध्ये बाजी मारली. पथ्रोटग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला गड प्रथमच हिरावला गेला आहे.स्थानिक आघाडी, पॅनेलची बाजीगावपातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी लक्ष ठेवून होते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्याच इशाऱ्यावर तडजोड झाली. स्थानिक गटांमध्ये तडजोड होऊन तयार झालेल्या आघाडी, युती, पॅनेलने बाजी मारली. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.२७० ग्रामपंचायतींमध्ये 'महिलाराज' जिल्ह्यात ५३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडल्या. यापैकी २७० ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणात महिला आरक्षण घोषित झाल्याने अनेकांचा हीरमोड झाला तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये सक्षम महिला उमेदवार मिळू शकले नाही. सरपंचपदाच्या निवडीकरिता तारीख जाहीर झाली असल्याने तोपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)