शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:55 IST

जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देपुन्हा काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपाच्या इराद्यांना अमरावतीच्या ग्रामीण जनतेने सुरूंग लावला आहे. तब्बल १३४ सरपंच निवडून आल्याची माहिती काँग्रेसने पत्रपरिषदेतून दिली. ही टक्केवारी ५४ इतकी होते. भाजपक्ष दावे मोठे करीत असला तरी अधिकृत पत्रपरिषद मात्र त्यांनी घेण्याचे टाळले.जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ९८२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७९३ प्रभागांतून २,०५९ सदस्यपदांसाठी ३,२६४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ११ नंतर सरपंचपदाचे निकाल जाहीर होताच जनतेने काँग्रेसला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.केवळ काँग्रेसचे आमदार असणाºया मतदारसंघातच नव्हे, तर बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थित सरपंचांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारनंतर आलेल्या निकालात दुसºया स्थानी भाजपसमर्थित सरपंच निवडून आलेत. प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांसह स्थानिक आघाड्यांचीही काही ठिकाणी सरशी झाली आहे. बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणाप्रणित युवा स्वाभिमान पार्टीने १२ जागांवर विजय मिळविला.चांदूर रेल्वे मतदारसंघात विजयाचे दावे-प्रतिदावेथेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वर्चस्वाचे दावे प्रतिदावे केले. दरम्यान, चांदूर रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत़ या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात राजकीय रंग चढला़ काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव तालुक्यात ५, नांदगाव खंडेश्वर ९ व चांदूर रेल्वे तालुक्यात १० सरपंचपदाचे विजयी उमेदवार काँग्रेसचे असल्याची माहिती दिली. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये भाजपने ९, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४ जागा काबीज केल्याचा दावा केला आहे.वरुड-मोर्शीची सोशल मीडियावर चर्चाजिल्ह्यात सर्वत्र क ाँग्रेस विजयी झाल्याची चर्चा होती, तर विदर्भासह संपूर्ण राज्यात भाजपने मतदारसंघनिहाय आकडे जारी करून विजय मिळविल्याचा फार्स निर्माण केला. मोर्शी-वरुड तालुक्यात १५ जागांवर विजय मिळविल्याचे संदेश राज्यभर फिरत होते. प्रत्यक्षात मोर्शी व वरुड तालुक्यात अनुक्रमे २४ व २३ अशा एकूण ४७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात भाजपचा १५ जागांचा दावा असला तरी ५० टक्क््यांचा आकडाही पार केला नव्हता. वरुड तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १८ जागा जिंकल्याचा दावा केला. मोर्शी तालुक्यात ११ जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजय मिळविला.१५९ सरपंच, भाजपचा दावाकाँग्रेसने सरपंचपदाचे १३४ उमेदवार निवडून आल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केल्यावर एका अंकाने सरस असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी भाजपचे १३५ उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती दिली. सोबतच त्यांनी भाजपा व मित्रपक्ष मिळून एकूण १५९ सरपंच असल्याचा दावा केला. आम्ही बुधवारी सर्व १५९ सरपंचांना शपथपत्रासह हजर करणार असल्याचे ते म्हणाले. तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे या तालुक्यांत पिछाडीवर असल्याचे त्यांनी मान्य केले.भाजप सर्वत्रपिछाडीवरधारणी तालुका वगळता भाजपने दणदणीत यश मिळविल्याचा दावा केला नाही. चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात प्रहारला यश मिळाले. काँग्रेसचे अस्तित्व तेथेही आहेच. तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, वरुड व मोर्शी या तालुक्यांत काँग्रेसने निर्विवाद विजय मिळविला आहे.कॉग्रेस आमदारांचा करिश्मा कायमआमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा व आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. मोदी लाटेतही काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी आमदारकीत देखणा विजय मिळविला होता. पुढे ही परंपरा विविध निवडणुकांत कायम ठेवत आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही त्यांनी स्वनेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.