शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:55 IST

जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देपुन्हा काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपाच्या इराद्यांना अमरावतीच्या ग्रामीण जनतेने सुरूंग लावला आहे. तब्बल १३४ सरपंच निवडून आल्याची माहिती काँग्रेसने पत्रपरिषदेतून दिली. ही टक्केवारी ५४ इतकी होते. भाजपक्ष दावे मोठे करीत असला तरी अधिकृत पत्रपरिषद मात्र त्यांनी घेण्याचे टाळले.जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ९८२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७९३ प्रभागांतून २,०५९ सदस्यपदांसाठी ३,२६४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ११ नंतर सरपंचपदाचे निकाल जाहीर होताच जनतेने काँग्रेसला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.केवळ काँग्रेसचे आमदार असणाºया मतदारसंघातच नव्हे, तर बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थित सरपंचांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारनंतर आलेल्या निकालात दुसºया स्थानी भाजपसमर्थित सरपंच निवडून आलेत. प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांसह स्थानिक आघाड्यांचीही काही ठिकाणी सरशी झाली आहे. बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणाप्रणित युवा स्वाभिमान पार्टीने १२ जागांवर विजय मिळविला.चांदूर रेल्वे मतदारसंघात विजयाचे दावे-प्रतिदावेथेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वर्चस्वाचे दावे प्रतिदावे केले. दरम्यान, चांदूर रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत़ या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात राजकीय रंग चढला़ काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव तालुक्यात ५, नांदगाव खंडेश्वर ९ व चांदूर रेल्वे तालुक्यात १० सरपंचपदाचे विजयी उमेदवार काँग्रेसचे असल्याची माहिती दिली. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये भाजपने ९, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४ जागा काबीज केल्याचा दावा केला आहे.वरुड-मोर्शीची सोशल मीडियावर चर्चाजिल्ह्यात सर्वत्र क ाँग्रेस विजयी झाल्याची चर्चा होती, तर विदर्भासह संपूर्ण राज्यात भाजपने मतदारसंघनिहाय आकडे जारी करून विजय मिळविल्याचा फार्स निर्माण केला. मोर्शी-वरुड तालुक्यात १५ जागांवर विजय मिळविल्याचे संदेश राज्यभर फिरत होते. प्रत्यक्षात मोर्शी व वरुड तालुक्यात अनुक्रमे २४ व २३ अशा एकूण ४७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात भाजपचा १५ जागांचा दावा असला तरी ५० टक्क््यांचा आकडाही पार केला नव्हता. वरुड तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १८ जागा जिंकल्याचा दावा केला. मोर्शी तालुक्यात ११ जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजय मिळविला.१५९ सरपंच, भाजपचा दावाकाँग्रेसने सरपंचपदाचे १३४ उमेदवार निवडून आल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केल्यावर एका अंकाने सरस असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी भाजपचे १३५ उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती दिली. सोबतच त्यांनी भाजपा व मित्रपक्ष मिळून एकूण १५९ सरपंच असल्याचा दावा केला. आम्ही बुधवारी सर्व १५९ सरपंचांना शपथपत्रासह हजर करणार असल्याचे ते म्हणाले. तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे या तालुक्यांत पिछाडीवर असल्याचे त्यांनी मान्य केले.भाजप सर्वत्रपिछाडीवरधारणी तालुका वगळता भाजपने दणदणीत यश मिळविल्याचा दावा केला नाही. चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात प्रहारला यश मिळाले. काँग्रेसचे अस्तित्व तेथेही आहेच. तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, वरुड व मोर्शी या तालुक्यांत काँग्रेसने निर्विवाद विजय मिळविला आहे.कॉग्रेस आमदारांचा करिश्मा कायमआमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा व आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. मोदी लाटेतही काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी आमदारकीत देखणा विजय मिळविला होता. पुढे ही परंपरा विविध निवडणुकांत कायम ठेवत आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही त्यांनी स्वनेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.