शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

By admin | Updated: August 3, 2015 00:14 IST

यंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना लाभ : प्रतिमाह प्रतिव्यक्ती पाच किलो धान्यलोकमत विशेष

गजानन मोहोड अमरावतीयंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटना या वर्षात घडू नयेत, यासाठी एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती, प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख २ हजार ६७ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.औरंगाबाद व अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आता २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य लवकरच मिळणार आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेणारे जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत इष्टांक मर्यादेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो. त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ केशरी कार्डधारकांना आता देण्यात येणार आहे. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. यापैकी २ लाख २ हजार ६० शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांना २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ मिळेल.प्राधान्य गटातील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू प्रतिमाह व प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य देण्यात येणार आहे.- रमेश मावस्कर, विभागीय उपायुक्त (पुरवठा)पांढरे रेशन कार्डधारक शेतकरी वंचितजिल्ह्यात शुभ्र शिधापत्रिकांची संख्या १४ हजार ८३६ आहे. यामध्ये १ हजार ४३२ हे शेतकरी आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना सवलतीच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवले आहे. दुष्काळ, नापिकी सर्व शेतकऱ्यांना सारखीच असताना शासन दुजाभाव करीत असल्याचा सदर शेतकऱ्यांचा आरोप आहे.