शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

गोविंदा, गोविंदाच्या जयघोषाने निनादला जीवनपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:01 IST

मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.

ठळक मुद्देचारशे वर्षांची परंपरा : एक किलोमीटर अंतरापर्यंत घातले लोटांगण

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.परतवाडा - अचलपूर या जुळ्या शहरात आजही पारंपारिक सण, उत्सव साजरे करण्याची प्रथा कायम आहे. जीवनपुरा येथे तिरुपती बालाजीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला (माडी पौर्णिमा) बालाजीचे भक्त येथे मोठा उत्सव साजरा करतात. परिसरातील महिला-पुरुष व नोकरदार बाहेरगावी राहत असले तरी बालाजी यात्रेच्या लोटांगणासाठी गावी परत येतात. आपले मागणे मान्य झाले किंवा श्रद्धेने हे लोटांगण घातल्या जाते. मुलांपासून तर वयोवृद्ध पुरुष मंडळीच हे लोटांगण घालतात, हे विशेष! या यात्रेमुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.मनोकामना पूर्ण होणार, अशी श्रद्धापहाटे ५ वाजता बालाजीची आरती शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर बालाजीला नतमस्तक होत होतात. नारळ घेऊन रस्त्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत ४७ भक्तांनी लोटांगण घातले. आपली मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. काही पूर्ण झाली म्हणून तर काहींनी श्रद्धेने लोटांगण घातले. लोटांगण टाकणाºयापुढे गोविंदा, गोविंदा म्हणत जयघोष केला.रस्त्यावर रांगोळ्या अन् फुलेलोटांगण कार्यक्रमासाठी संपूर्ण रस्ता स्वच्छ धुण्यात आला. पहाटे ४ वाजतापासून भक्त आंघोळ करीत घरीच पूजा केली. रस्त्यावर रांगोळ्या अन् फुले सजविण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बिच्छन नदीला पाणी नसल्याने टँकरने एक खड्डा करुन पाणी सोडण्यात आले होते. तीन दिवस विविध कार्यक्रम आणि जत्रा येथे भरली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती,दरवर्षीप्रमाणे यावर्षी ४७ भक्तांनी लोटांगण घातले. बालाजी संस्थान व जीवनपुरातील नागरिकांचे यासाठी नियमित सहकार्य आम्हास लाभले.- प्रमोद शामगुलेपुजारी बालाजी संस्थान, अचलपूर