शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

गोविंदा, गोविंदाच्या जयघोषाने निनादला जीवनपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:01 IST

मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.

ठळक मुद्देचारशे वर्षांची परंपरा : एक किलोमीटर अंतरापर्यंत घातले लोटांगण

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.परतवाडा - अचलपूर या जुळ्या शहरात आजही पारंपारिक सण, उत्सव साजरे करण्याची प्रथा कायम आहे. जीवनपुरा येथे तिरुपती बालाजीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला (माडी पौर्णिमा) बालाजीचे भक्त येथे मोठा उत्सव साजरा करतात. परिसरातील महिला-पुरुष व नोकरदार बाहेरगावी राहत असले तरी बालाजी यात्रेच्या लोटांगणासाठी गावी परत येतात. आपले मागणे मान्य झाले किंवा श्रद्धेने हे लोटांगण घातल्या जाते. मुलांपासून तर वयोवृद्ध पुरुष मंडळीच हे लोटांगण घालतात, हे विशेष! या यात्रेमुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.मनोकामना पूर्ण होणार, अशी श्रद्धापहाटे ५ वाजता बालाजीची आरती शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर बालाजीला नतमस्तक होत होतात. नारळ घेऊन रस्त्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत ४७ भक्तांनी लोटांगण घातले. आपली मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. काही पूर्ण झाली म्हणून तर काहींनी श्रद्धेने लोटांगण घातले. लोटांगण टाकणाºयापुढे गोविंदा, गोविंदा म्हणत जयघोष केला.रस्त्यावर रांगोळ्या अन् फुलेलोटांगण कार्यक्रमासाठी संपूर्ण रस्ता स्वच्छ धुण्यात आला. पहाटे ४ वाजतापासून भक्त आंघोळ करीत घरीच पूजा केली. रस्त्यावर रांगोळ्या अन् फुले सजविण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बिच्छन नदीला पाणी नसल्याने टँकरने एक खड्डा करुन पाणी सोडण्यात आले होते. तीन दिवस विविध कार्यक्रम आणि जत्रा येथे भरली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती,दरवर्षीप्रमाणे यावर्षी ४७ भक्तांनी लोटांगण घातले. बालाजी संस्थान व जीवनपुरातील नागरिकांचे यासाठी नियमित सहकार्य आम्हास लाभले.- प्रमोद शामगुलेपुजारी बालाजी संस्थान, अचलपूर