शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोविंदा, गोविंदाच्या जयघोषाने निनादला जीवनपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:01 IST

मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.

ठळक मुद्देचारशे वर्षांची परंपरा : एक किलोमीटर अंतरापर्यंत घातले लोटांगण

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मागील चारशे वर्षांपासून अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील बालाजी संस्थान मंदिरातील लोटांगण घालण्याची प्रथा कायम असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता ४७ भक्तांनी मंदिर ते बिच्छन नदीच्या पात्रापर्यंत लोटांगण घालून आपल्या श्रद्धेचा परिचय देत पूजा अर्चा केली.परतवाडा - अचलपूर या जुळ्या शहरात आजही पारंपारिक सण, उत्सव साजरे करण्याची प्रथा कायम आहे. जीवनपुरा येथे तिरुपती बालाजीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला (माडी पौर्णिमा) बालाजीचे भक्त येथे मोठा उत्सव साजरा करतात. परिसरातील महिला-पुरुष व नोकरदार बाहेरगावी राहत असले तरी बालाजी यात्रेच्या लोटांगणासाठी गावी परत येतात. आपले मागणे मान्य झाले किंवा श्रद्धेने हे लोटांगण घातल्या जाते. मुलांपासून तर वयोवृद्ध पुरुष मंडळीच हे लोटांगण घालतात, हे विशेष! या यात्रेमुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.मनोकामना पूर्ण होणार, अशी श्रद्धापहाटे ५ वाजता बालाजीची आरती शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर बालाजीला नतमस्तक होत होतात. नारळ घेऊन रस्त्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत ४७ भक्तांनी लोटांगण घातले. आपली मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. काही पूर्ण झाली म्हणून तर काहींनी श्रद्धेने लोटांगण घातले. लोटांगण टाकणाºयापुढे गोविंदा, गोविंदा म्हणत जयघोष केला.रस्त्यावर रांगोळ्या अन् फुलेलोटांगण कार्यक्रमासाठी संपूर्ण रस्ता स्वच्छ धुण्यात आला. पहाटे ४ वाजतापासून भक्त आंघोळ करीत घरीच पूजा केली. रस्त्यावर रांगोळ्या अन् फुले सजविण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बिच्छन नदीला पाणी नसल्याने टँकरने एक खड्डा करुन पाणी सोडण्यात आले होते. तीन दिवस विविध कार्यक्रम आणि जत्रा येथे भरली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती,दरवर्षीप्रमाणे यावर्षी ४७ भक्तांनी लोटांगण घातले. बालाजी संस्थान व जीवनपुरातील नागरिकांचे यासाठी नियमित सहकार्य आम्हास लाभले.- प्रमोद शामगुलेपुजारी बालाजी संस्थान, अचलपूर