शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत काढली ‘सरकारची तिरडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:53 IST

सरकारी धोरणाचा निषेध : शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडकआॅनलाईन लोकमतमोर्शी : सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासनावर बोळवण करीत आहे, असा आरोप करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनात दिलेली सरसकट कर्जमाफी ...

सरकारी धोरणाचा निषेध : शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडकआॅनलाईन लोकमतमोर्शी : सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासनावर बोळवण करीत आहे, असा आरोप करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनात दिलेली सरसकट कर्जमाफी तत्काळ देण्यात यावी, कापसाला प्रतीक्विंटल ७ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा, सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव मिळावा. शेतमाल खरेदीच्या जाचक अटी व निकष रद्द करून ज्या स्थितीत उत्पादन झाले, तेच संपूर्ण सोयाबीन खरेदी करावे. तुरीला ७ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. शेत विम्याची भरपाई मिळावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, कृषी पंपांचा वीजपुरवठा व्हावा, यासाठी उच्चदाबाचे ट्रान्सफार्मर लावावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्त्व युवक काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी केले.यावेळी झालेल्या सभेत विक्रम ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत शेतकरी विरोधी धोरण सरकारने अवलंबले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर हैराण झाले आहते. प्रचंड महागाई, खोटे आश्वासन, फक्त शासनाच्या जाहिराती एवढेच सरकारचे धोरण आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक केली. यासंदर्भात नायब तहसीलदार अभय वंजारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, वरुड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, अब्दुल नईम, राजा बेले, नितीन उमाळे, विजय कोकाटे, सागर ठाकरे, नितीन पन्नासे, योगेश गणेश्वर, प्रीती देशमुख, साधना साठवणे, लता परतेती, अब्दुल रहीम कुरेशी, हरिभाऊ सुखसोहळे, आशा गहिरवाल, प्रभाकर वाहाणे, मोहन गोमकाळे, शरद विधळे आदी शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.संत्रापिकाला संजीवनी द्यासन २०१६ साली झालेल्या गारपिटीत संत्रापिकाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील हिवरखेड, यावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी व इतर बºयाच गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, ती त्वरित देण्यात यावी. यंदा संत्रापिकाचा आंबिया बहर गळाला व मृगबहर आलाच नाही. याचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.जनसामान्यांच्या मागण्याकेवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर जनसामान्यांच्यादेखील मागण्या यावेळी मांडण्यात आल्यात. तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करावे, मोशीचा जलसंकटावर तोडगा काढावा. नांदगाव-पेठ येथील टोलनाक्यावर वरुड-मोर्शी परिसरातील नागरिकांना सूट मिळण्यात यावी. सिलिंडरची व पेट्रोलची झालेली दरवाढ रद्द करावी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ज्या सत्राची त्या सत्रातच त्वरित देण्यात यावी. भूमिहीन शेतमजुरांना प्रतिमाह २००० रुपये पेन्शन देण्यात यावी, या मुद्याचादेखील निवेदनात समावेश होता.