शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोर्शीत काढली ‘सरकारची तिरडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:53 IST

सरकारी धोरणाचा निषेध : शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडकआॅनलाईन लोकमतमोर्शी : सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासनावर बोळवण करीत आहे, असा आरोप करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनात दिलेली सरसकट कर्जमाफी ...

सरकारी धोरणाचा निषेध : शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडकआॅनलाईन लोकमतमोर्शी : सरकारच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधारी केवळ आश्वासनावर बोळवण करीत आहे, असा आरोप करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनात दिलेली सरसकट कर्जमाफी तत्काळ देण्यात यावी, कापसाला प्रतीक्विंटल ७ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा, सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव मिळावा. शेतमाल खरेदीच्या जाचक अटी व निकष रद्द करून ज्या स्थितीत उत्पादन झाले, तेच संपूर्ण सोयाबीन खरेदी करावे. तुरीला ७ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. शेत विम्याची भरपाई मिळावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, कृषी पंपांचा वीजपुरवठा व्हावा, यासाठी उच्चदाबाचे ट्रान्सफार्मर लावावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्त्व युवक काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी केले.यावेळी झालेल्या सभेत विक्रम ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत शेतकरी विरोधी धोरण सरकारने अवलंबले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर हैराण झाले आहते. प्रचंड महागाई, खोटे आश्वासन, फक्त शासनाच्या जाहिराती एवढेच सरकारचे धोरण आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक केली. यासंदर्भात नायब तहसीलदार अभय वंजारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, वरुड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, अब्दुल नईम, राजा बेले, नितीन उमाळे, विजय कोकाटे, सागर ठाकरे, नितीन पन्नासे, योगेश गणेश्वर, प्रीती देशमुख, साधना साठवणे, लता परतेती, अब्दुल रहीम कुरेशी, हरिभाऊ सुखसोहळे, आशा गहिरवाल, प्रभाकर वाहाणे, मोहन गोमकाळे, शरद विधळे आदी शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.संत्रापिकाला संजीवनी द्यासन २०१६ साली झालेल्या गारपिटीत संत्रापिकाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील हिवरखेड, यावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी व इतर बºयाच गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, ती त्वरित देण्यात यावी. यंदा संत्रापिकाचा आंबिया बहर गळाला व मृगबहर आलाच नाही. याचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.जनसामान्यांच्या मागण्याकेवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर जनसामान्यांच्यादेखील मागण्या यावेळी मांडण्यात आल्यात. तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करावे, मोशीचा जलसंकटावर तोडगा काढावा. नांदगाव-पेठ येथील टोलनाक्यावर वरुड-मोर्शी परिसरातील नागरिकांना सूट मिळण्यात यावी. सिलिंडरची व पेट्रोलची झालेली दरवाढ रद्द करावी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ज्या सत्राची त्या सत्रातच त्वरित देण्यात यावी. भूमिहीन शेतमजुरांना प्रतिमाह २००० रुपये पेन्शन देण्यात यावी, या मुद्याचादेखील निवेदनात समावेश होता.