शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

भंगार वाहनांमुळे शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

By जितेंद्र दखने | Updated: August 24, 2023 20:45 IST

निर्लेखित वाहनांची लागेना विल्हेवाट

अमरावती : शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या दिमतीला सरकारकडून वाहने पुरविली जातात. मात्र, ही वाहने नियमानुसार कालबाह्य झाल्यानंतर त्याची वेळीच विल्हेवाट लावली जात नसल्याने भंगार अवस्थेत पडून आहेत. परिणामी या वाहनांचा लिलाव करून विल्हेवाट विहीत मुदतीत लावली जात नाही.परिणामी शासनाच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, गृहनिर्माण विभागाच्या परिसरात अशा भंगार गाड्यांचा कचरा जागोजागी पडला असून, हीच परिस्थिती आरोग्य विभागासह अन्य विभागांतही दिसून येत आहे. शासनाच्या धोरणानुसार कुठल्याही वाहनाचे आयुर्मान १५ वर्षे ठरले आहे. याशिवाय ज्या शासकीय विभागातील वाहन किमान अडीच लाख किलोमीटर किंवा दहा वर्षाहून अधिक वापर होऊन नादुरुस्त झालीत, अशी वाहने नियमानुसार निर्लेखित केली जातात. सदर वाहनांचे नियमानुसार मूृल्यांकन करून त्याची लिलावाद्वारे किती किंमत अपेक्षित आहे, याचेही नियोजन केले जाते. प्रत्यक्षात शासकीय विभागाकडे वापरात नसलेली अशी बरीच वाहने शासकीय कार्यालयाच्या परिसरात जागा व्यापून आहेत. मात्र अनेक भंगार वाहनांची संबंधित विभागाकडून वेळीच विल्हेवाट न लावल्यामुळे ती जागीच गंजत आहेत. परिणामी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शासनाच्या या वाहनांचा लिलाव केला जात नसल्याने याबदल्यात मिळणारा लाखो रुपयांचा महसूृल बुडत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. 

मनपा,एसटी महामंडळाला मिळाला मोबदलास्थानिक  महापालिका प्रशासनाने भंगार वाहने व निरुपयोगी साहित्याचा लिलाव करून सुमारे ६२ लाख ८० हजार ९९७ रुपये शासन तिजोरीत जमा केले. याशिवाय एसटी महामंडळाकडूनही एसटी बसचे १५ वर्षांनंतर आयुर्मान संपताच अशा गाड्या स्क्रॅप केल्या आहेत. या बदल्यात महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे. असे असतांना जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागात भंगार वाहने पडून आहेत. त्याची निर्लेखनानंतर विल्हेवाट का लावली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.