शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

शासन युतीचे योजना आघाडीच्याच!

By admin | Updated: January 5, 2016 00:12 IST

राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून ...

माहिती पुस्तिका धूळ खात : नव्या पुस्तकांची अद्यापही प्रतीक्षा कायमचअमरावती : राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अद्यापही आघाडी शासनाचीच ओळख कायम ठेवल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौद्ध, मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अशा विविध समाज घटकातील लाभार्थ्यासाठी योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. शिष्यवृत्ती शिवाय इतर योजनाही राबविल्या जातात. या योजना त्या त्या समाज घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. मात्र मागील आघाडी शासनाच्या कार्यकाळातील माहिती पुस्तिकाच अमरावतीत नव्हे बऱ्याच ठिकाणी समाजकल्याण विभागात माहिती पुस्तिका आघाडी शासनाचीच पडून आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना त्याचा लाभ याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना समाजकल्याण विभागाकडून आघाडी शासनाच्या काळातील पुस्तिकाच दिली जाते. याच योजना सुरू असल्याचे या विभागाकडून सांगितले जाते. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता शिष्यवृत्ती व इतर घटकांसाठीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. यासाठी जी माहिती पुस्तिका आहे त्यामुळे ही पुस्तिका वितरित केली जात नाही. (प्रतिनिधी)दोष कुणाचा ?राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर युती शासनाने विविध योजना नव्या धोरणाचा सपाटा लावला या प्रक्रियेत सामाजिक न्याय विभागातील नव्या योजनांचा समावेश झाला नाही का, नव्या योजना आल्या असतील तर त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. यात नेमका दोष शासनाचा की त्या त्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचा हाही प्रश्न यानिमित्याने उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही आघाडीचेचसमाज कल्याण विभागातर्फे जी माहीती पुस्तिका उपलब्ध आहे या पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, हे आघाडी शासन काळातील अर्थात पृथ्वीराज चव्हाण, अजीत पवार, शिवाजीराव मोघे यांचा नावाचा आहे.