शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

शासन युतीचे योजना आघाडीच्याच!

By admin | Updated: January 5, 2016 00:12 IST

राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून ...

माहिती पुस्तिका धूळ खात : नव्या पुस्तकांची अद्यापही प्रतीक्षा कायमचअमरावती : राज्यातील आघाडी शासन पायउतार होऊन आता एक वर्ष झाले. नव्या युती सरकारने नवे धोरण, नव्या योजना जाहीर करून आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अद्यापही आघाडी शासनाचीच ओळख कायम ठेवल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती, नवबौद्ध, मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अशा विविध समाज घटकातील लाभार्थ्यासाठी योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे. शिष्यवृत्ती शिवाय इतर योजनाही राबविल्या जातात. या योजना त्या त्या समाज घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. मात्र मागील आघाडी शासनाच्या कार्यकाळातील माहिती पुस्तिकाच अमरावतीत नव्हे बऱ्याच ठिकाणी समाजकल्याण विभागात माहिती पुस्तिका आघाडी शासनाचीच पडून आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना त्याचा लाभ याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना समाजकल्याण विभागाकडून आघाडी शासनाच्या काळातील पुस्तिकाच दिली जाते. याच योजना सुरू असल्याचे या विभागाकडून सांगितले जाते. समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता शिष्यवृत्ती व इतर घटकांसाठीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. यासाठी जी माहिती पुस्तिका आहे त्यामुळे ही पुस्तिका वितरित केली जात नाही. (प्रतिनिधी)दोष कुणाचा ?राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर युती शासनाने विविध योजना नव्या धोरणाचा सपाटा लावला या प्रक्रियेत सामाजिक न्याय विभागातील नव्या योजनांचा समावेश झाला नाही का, नव्या योजना आल्या असतील तर त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. यात नेमका दोष शासनाचा की त्या त्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचा हाही प्रश्न यानिमित्याने उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही आघाडीचेचसमाज कल्याण विभागातर्फे जी माहीती पुस्तिका उपलब्ध आहे या पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, हे आघाडी शासन काळातील अर्थात पृथ्वीराज चव्हाण, अजीत पवार, शिवाजीराव मोघे यांचा नावाचा आहे.