शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:19 IST

मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी.

ठळक मुद्देसुनील तटकरे : हल्लाबोल आंदोलनातून फसवे सरकार खाली खेचू

आॅनलाईन लोकमतअमरावती : मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी. विदर्भात जी काही सिंचन क्षमता वाढले, ती आघाडी शासनाच्या काळातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला.सुनील तटकरे हे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय पदाधिकारी मेळाव्यात आले होते. त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर हल्ला चढविला. राज्यातील सर्व शेतकºयांना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याकरिता ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅनलाइन प्रक्रि येत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव गौतम प्रधान यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, गृहिणी या सर्वांना हे अपयशी सरकार नकोच आहे, असे तटकरे म्हणाले. विधान परिषदेत भाजपसोबत हातमिळवणी करणार काय, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. समविचारी पक्षांसोबत मैत्री करू.विदर्भात सिंचन अनुशेषवाढीला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, विदर्भात सिंचन वाढले ते केवळ आघाडी सरकारच्या कार्यकाळात. खुद्द नितीन गडकरींनी २३.५ टक्के सिंचन असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याचा मुद्दा तटकरेंनी यावेळी नमूद केला. सिंचन घोटाळा आरोपाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंने छेडले असता, ते म्हणाले, मी चौकशीला घाबरत नाही. १२ डिसेंबर २०१४ पासून चौकशी सुरू असून, पूर्णत: सहकार्य करीत आहे. खरेच घोटाळा झाला काय, हे राज्यातील १२ कोटी जनतेसमोर एकदाचे यावे, ही माझीसुद्धा मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, रमेश बंग, सुभाष ठाकरे, वसुधा देशमुख, संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, सुनील वºहाडे, बाबा राठोड आदी यावेळी उपस्थित होते.नागपुरात १२ डिसेंबर रोजी सरकारविरोधी हल्लाबोलशेतकºयांना आरोपींच्या पिंजºयात उभे करणाऱ्या राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळातून १ नोव्हेंबरपासून दिंडी यात्रेचे आयोजन केले आहे. नागपुरात १२ डिसेंबरला पुरोगामी विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार असून, सरकारविरोधी हल्लाबोल सभेला खा. शरद पवार हे संबोधित करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.