शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
6
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
7
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
8
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
9
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
10
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
11
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
12
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
13
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
14
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
15
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
16
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
17
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
18
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
19
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
20
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:19 IST

मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी.

ठळक मुद्देसुनील तटकरे : हल्लाबोल आंदोलनातून फसवे सरकार खाली खेचू

आॅनलाईन लोकमतअमरावती : मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी. विदर्भात जी काही सिंचन क्षमता वाढले, ती आघाडी शासनाच्या काळातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला.सुनील तटकरे हे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय पदाधिकारी मेळाव्यात आले होते. त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर हल्ला चढविला. राज्यातील सर्व शेतकºयांना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याकरिता ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅनलाइन प्रक्रि येत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव गौतम प्रधान यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, गृहिणी या सर्वांना हे अपयशी सरकार नकोच आहे, असे तटकरे म्हणाले. विधान परिषदेत भाजपसोबत हातमिळवणी करणार काय, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. समविचारी पक्षांसोबत मैत्री करू.विदर्भात सिंचन अनुशेषवाढीला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, विदर्भात सिंचन वाढले ते केवळ आघाडी सरकारच्या कार्यकाळात. खुद्द नितीन गडकरींनी २३.५ टक्के सिंचन असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याचा मुद्दा तटकरेंनी यावेळी नमूद केला. सिंचन घोटाळा आरोपाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंने छेडले असता, ते म्हणाले, मी चौकशीला घाबरत नाही. १२ डिसेंबर २०१४ पासून चौकशी सुरू असून, पूर्णत: सहकार्य करीत आहे. खरेच घोटाळा झाला काय, हे राज्यातील १२ कोटी जनतेसमोर एकदाचे यावे, ही माझीसुद्धा मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, रमेश बंग, सुभाष ठाकरे, वसुधा देशमुख, संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, सुनील वºहाडे, बाबा राठोड आदी यावेळी उपस्थित होते.नागपुरात १२ डिसेंबर रोजी सरकारविरोधी हल्लाबोलशेतकºयांना आरोपींच्या पिंजºयात उभे करणाऱ्या राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळातून १ नोव्हेंबरपासून दिंडी यात्रेचे आयोजन केले आहे. नागपुरात १२ डिसेंबरला पुरोगामी विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार असून, सरकारविरोधी हल्लाबोल सभेला खा. शरद पवार हे संबोधित करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.