शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:19 IST

मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी.

ठळक मुद्देसुनील तटकरे : हल्लाबोल आंदोलनातून फसवे सरकार खाली खेचू

आॅनलाईन लोकमतअमरावती : मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी. विदर्भात जी काही सिंचन क्षमता वाढले, ती आघाडी शासनाच्या काळातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला.सुनील तटकरे हे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय पदाधिकारी मेळाव्यात आले होते. त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर हल्ला चढविला. राज्यातील सर्व शेतकºयांना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याकरिता ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅनलाइन प्रक्रि येत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव गौतम प्रधान यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, गृहिणी या सर्वांना हे अपयशी सरकार नकोच आहे, असे तटकरे म्हणाले. विधान परिषदेत भाजपसोबत हातमिळवणी करणार काय, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. समविचारी पक्षांसोबत मैत्री करू.विदर्भात सिंचन अनुशेषवाढीला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, विदर्भात सिंचन वाढले ते केवळ आघाडी सरकारच्या कार्यकाळात. खुद्द नितीन गडकरींनी २३.५ टक्के सिंचन असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याचा मुद्दा तटकरेंनी यावेळी नमूद केला. सिंचन घोटाळा आरोपाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंने छेडले असता, ते म्हणाले, मी चौकशीला घाबरत नाही. १२ डिसेंबर २०१४ पासून चौकशी सुरू असून, पूर्णत: सहकार्य करीत आहे. खरेच घोटाळा झाला काय, हे राज्यातील १२ कोटी जनतेसमोर एकदाचे यावे, ही माझीसुद्धा मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, रमेश बंग, सुभाष ठाकरे, वसुधा देशमुख, संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, सुनील वºहाडे, बाबा राठोड आदी यावेळी उपस्थित होते.नागपुरात १२ डिसेंबर रोजी सरकारविरोधी हल्लाबोलशेतकºयांना आरोपींच्या पिंजºयात उभे करणाऱ्या राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळातून १ नोव्हेंबरपासून दिंडी यात्रेचे आयोजन केले आहे. नागपुरात १२ डिसेंबरला पुरोगामी विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार असून, सरकारविरोधी हल्लाबोल सभेला खा. शरद पवार हे संबोधित करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.