शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बांगलादेशने संत्र्यावरचा आयात कर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

वरूड : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तसेच बांगलादेशने आयात कर वाढविल्यामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीला अनुसरून वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास ...

वरूड : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तसेच बांगलादेशने आयात कर वाढविल्यामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीला अनुसरून वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत पत्र देऊन विनंती केली.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्षाला सरासरी दीड लाख मॅट्रिक टन संत्रा बांगलादेश ला जात असतो . बांगलादेश ने २०२१-२२ पासून आयात कर वाढविल्यामुळे शेतकऱ्याना निर्यात करण्याकरिता अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा विदेशात पाठविणे काहीं झाले . बांगलादेशात मोठ्या प्रमाणात वरुड तालुक्यातून संत्राची निर्यात केली जाते. बांगलादेशाने आयात कर मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे . याकरिता ऑल इंडिया इंडो बांगला संत्रा निर्यात संघ वरुड, माजी कृषी मंत्री . अनिल बोंडे , आ . देवेंद्र भुयार तसेच अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून खा.श्री . रामदास तडस यांना आयात कर संबंधीचे निवेदन देण्यात आली होती . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या विषयावर योग्य कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कडे चर्चा करून तसे पत्र खा. रामदास तडस यांनी दिले . केंद्रीय वाणिज्य मंत्र्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान वर्तमान परिस्थिती बाबत अवगत केले. आयात कर कमी करण्याचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा असल्याने भारत सरकार निश्चितच शेतकऱ्याची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याकरिता संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना सहकार्य करेल अशी ग्वाही दिल्याचे खा.रामदास तडस यांनी सांगितले .