शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात सरकार असंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:48 IST

मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत त्याच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना दूबार पेरणीसाठी अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्या काँग्रेसने मांडल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत त्याच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना दूबार पेरणीसाठी अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्या काँग्रेसने मांडल्या.काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या बेकायदेशीर अटकेचा तीव्र निषेध मोर्चेकºयांनी नोंदविला. प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.जिल्हाभरात मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व आता समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतातुर झाला आहे. युती शासनाने शेतकºयांची कर्जमाफी करताना जाचक अटी-शर्ती लागू केल्या. ८५ टक्के शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकºयांना तात्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. पावसाअभावी करपलेल्या पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. संत्राबागांचे तातडीने सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचा लाभ शेतकºयांना प्रकर्षाने देण्यात यावा. मुंबई येथील मालाड व तिवरे घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी. दुबार पेरणीकरिता शेतकºयांना पुन्हा बी-बियाणे उपलब्ध करावे. पशुधनासाठी चारा डेपो व छावण्या सुरू कराव्यात. शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. मजुरांना रोहयो अंतर्गत कामे सुरू करून दर आठवड्याला मजूरी देण्यात यावी आदी मागण्या काँग्रेसने आपल्या आंदोलनात मांडल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, हरिभाऊ मोहोड, सतीश हाडोळे, महेंद्र गैलवार, अभिजित देवके, दयाराम काळे, प्रमोद दाळू, सुरेश आडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, सुधाकर भारसाकळे, बंडृू देशमुख, सुधाकर खारोडे, दिलीप काळपांडे, अलका देशमुख, विनोद गुडधे, बापूराव गायकवाड, बाबूराव जवंजाळ, राजेंद्र गोरले, परीक्षित जगताप, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, पकंज मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग यावेळी होता.