शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

शेतकरी संकटात सरकार असंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:48 IST

मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत त्याच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना दूबार पेरणीसाठी अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्या काँग्रेसने मांडल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग विविध संकटांना समोरा जात आहे. यंदाही अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांन प्रति असंवेदनशील असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने करीत त्याच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना दूबार पेरणीसाठी अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्या काँग्रेसने मांडल्या.काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या बेकायदेशीर अटकेचा तीव्र निषेध मोर्चेकºयांनी नोंदविला. प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.जिल्हाभरात मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व आता समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतातुर झाला आहे. युती शासनाने शेतकºयांची कर्जमाफी करताना जाचक अटी-शर्ती लागू केल्या. ८५ टक्के शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकºयांना तात्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. पावसाअभावी करपलेल्या पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. संत्राबागांचे तातडीने सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचा लाभ शेतकºयांना प्रकर्षाने देण्यात यावा. मुंबई येथील मालाड व तिवरे घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी. दुबार पेरणीकरिता शेतकºयांना पुन्हा बी-बियाणे उपलब्ध करावे. पशुधनासाठी चारा डेपो व छावण्या सुरू कराव्यात. शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. मजुरांना रोहयो अंतर्गत कामे सुरू करून दर आठवड्याला मजूरी देण्यात यावी आदी मागण्या काँग्रेसने आपल्या आंदोलनात मांडल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, हरिभाऊ मोहोड, सतीश हाडोळे, महेंद्र गैलवार, अभिजित देवके, दयाराम काळे, प्रमोद दाळू, सुरेश आडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, सुधाकर भारसाकळे, बंडृू देशमुख, सुधाकर खारोडे, दिलीप काळपांडे, अलका देशमुख, विनोद गुडधे, बापूराव गायकवाड, बाबूराव जवंजाळ, राजेंद्र गोरले, परीक्षित जगताप, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, पकंज मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग यावेळी होता.