शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

वऱ्हाडातील साडेतीन लाख खातेदारांचा सातबारा कोरा, जिल्हा बँकांना शासनाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 18:29 IST

कर्जमाफी जाहीर केलेल्या तारखेपासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी करू नये, असे यापूर्वीच शासनाचे बजावले.

- गजानन मोहोड

अमरावती : कर्जमाफी जाहीर केलेल्या तारखेपासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी करू नये, असे यापूर्वीच शासनाचे बजावले. मात्र, व्यापारी बँका व जिल्हा बँकामध्ये एकवाक्यता नसल्याने सहकार विभागाने १३ मार्चला परिपत्रक काढून जिल्हा बँकाना तंबी दिली. त्यामुळे अमरावती विभागातील जिल्हा बँकांच्या आतापर्यंत १५२६ कोटींची कर्जमाफी झालेल्या ३ लाख ५३ हजार ८५४ खातेदारांचा सातबारा कोरा होणार आहे व प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या किमान ४५ कोटींच्या व्याज आकारणीपासून शेतकरी बचावला आहे.

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीचे आदेश २८ जून २०१७ ला जारी केले व एकवेळ समझोता योजना (ओटीएस) अंतर्गतही शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला. ३० जून २०१६ ते ३१ जुलै २०१७ पर्र्यंतच्या थकबाकी रकमेवर व्याजाची जबाबदारी शासनाने स्वीकारली. मात्र, या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे एक ऑगस्ट २०१७ ते योजनेचा शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत संबंधित शेतकºयांच्या खात्यांवर व्याजाची आकारणी झाल्यास, ते खाते निरंक राहणार नाही व शेतकºयांना नव्याने कर्जाचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ८ फेब्रुुवारी २०१८ ला झालेल्या राज्यस्तरीय बॅकर्स समिती (एसएलबीची) च्या बैठकीत लोकहितास्तव बँकांनी अशा खात्यावर व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश दिलेत. कर्जमाफीमुळे बँकांचा एनपीए कमी होत असल्याने योजनेच्या लाभार्थींच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी करू नये, असे शासनाने बजावले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतरचे आकारणी होणाºया किमान ४५ कोटींच्या व्याजापासून शेतकºयांची सुटका होऊन नव्याने कर्ज मिळण्याचा अडथळा पार झाला आहे. 

जिल्हा बँकेस सूचना, सहकार विभागाची माहिती२२ फेब्रुवारी २०१८ ला ‘एसएलबीसी’द्वारा व्यापारी बँकांच्या बैठकीत याच सूचनांचा पुरूच्चार करण्यात आला. काही बँकांनी या निर्देशांचा अवलंब केला, तर काही जिल्हा बँकांनी व्याजाची आकारणी सुरूच ठेवल्याने कर्जमाफीच्या मूळ उद्देशालाच तडा गेला. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ (अ) नुसार या योजनेच्या लाभार्थींना कर्जमाफीचा लाभ मिळेतोवर थकीत रकमेवर कर्जाची आकारणी करू नये, असे आदेश सहकार विभागाने बजावले आहेत.

 जिल्हा बँकांच्या कर्जमाफीची सद्यस्थितीविभागात सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या ३,५८,८५४ खातेदारांची १५२५.७८ कोटींची कर्जमाफी बँक खात्यात वर्ग करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ६५ हजार ८४९ खातेदारांची २९६.३० कोटी, अकोला जिल्ह्यात ७८ हजार ७३५ खातेदारांची २९४.१२ कोटी, वाशिम जिल्ह्यात ६४ हजार ३११ खातेदारांची २४८.९९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ११ हजार ९४९ खातेदारांची ५६२.२९ कोटी, तर बुलडाणा जिल्ह्यात ३३ हजार १० शेतकºयांची १५१.०७ कोटींची कर्जमाफी करण्यात आली.