शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

खोटी स्वप्ने दाखविणारे सरकार अपयशी

By admin | Updated: July 30, 2016 00:10 IST

दोन वर्षांपूर्वी खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले केंद्र आणि राज्याचे सरकार अपयशी ठरले आहे.

काँग्रेसची बैठक : निवडून येण्याची पात्रता असणाऱ्यांनाच तिकीट, जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती नाहीपरतवाडा : दोन वर्षांपूर्वी खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले केंद्र आणि राज्याचे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात शेतकरी भिकारी झाला असून आत्महत्या वाढल्या आहेत. दलित, बहुजन, अल्पसंख्याकांना शासनाने वेठीस धरल्याने शासनाप्रती जनाक्रोश वाढत आहे. तेव्हा येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पुन्हा जोमाने काम करून सत्ता आणा. जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत कुठेच युती होणार नाही आणि जो निवडून येईल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे गटातटाचे राजकारण बंद करून एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.गुरुवारी सायंकाळी अचलपूर-परतवाडा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक तथा वर्धेचे माजी नगरसेवक शेखर शेंडे, माजी आ. केवलराम काळे, हरिशंकरजी अग्रवाल, नियाजभाई, हरिदासजी नाथे, डी. पी. राऊत, मो. गणीभाई, साजीद फुलारी, प्रकाश वैद्य, राजेंद्र गोरले, अजीज खान, जहीरभाई, बंडू वासनकर, गौरव काळे, पुरुषोत्तम बोरेकार, हरिश्चंद्र मुगल, राजाभाऊ चित्रकार, कैलास आवारे, इकबाल पटेल, प्रशांत देशमुख, जी. एम. खान, श्रीकांत झोडपे, सागर व्यास, अमोल बोरेकार, किसन दहीकर, वैशाली कडू, सविता बरमा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उमेदवार निवडीसाठी समितीजिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी जिल्हाभर समित्या नियुक्त करण्यात यईल. काँग्रेसचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यावर भर राहील, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत कुठल्याच प्रकारची युती केली जाणार नसल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले. निवडणुका पुढे आहेत. संगठन शक्ती मजबूत करण्याची गरज आहे. मागील दोन वर्षात सामान्य कार्यकर्त्यांना वरिष्ठ स्तरावर न्याय मिळाला नाही. जिल्ह्यात स्थानीय स्वराज्य संस्थांवर काँग्रेसची सत्ता आहे. ती पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केवलराम काळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)नगराध्यक्षपदासाठी दोन वर्षांनंतर घोडेबाजारकाँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रपरिषद घेण्यात आली. त्यामध्ये नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून दिल्यानंतर दोन वर्षांनंतर अविश्वासाची टांगती तलवार पाहता घोडेबाजार होणार आहे. त्यामुळे अविश्वाससुद्धा जनतेतून घेण्याचे मत बबलू देशमुख यांनी मांडले. गटबाजी होणार नाही, यावर लक्ष दिले जाईल, तर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितींची कामे मोठ्या प्रमाणात दिसत असताना आमदारांची कामे कुठे गेली, असा टोला त्यांनी लगावला. पत्रपरिषदेला निरीक्षक शेखर शेंडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, हरिशंकर अग्रवाल उपस्थित होते.‘ताई’ गेल्या, गटातटाचा विषय संपलाअचलपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण होते. ‘वसुधाताई’ आणि ‘बबलूभाऊ’ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. आता ताई राष्ट्रवादीत गेल्याने सर्व विषय संपला आहे. स्थानीय स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करा, असा सल्ला बबलू देशमुख यांनी दिला.नेतृत्व सक्षम करादोन वर्षांपूर्वी एक लाट आली होती. स्थानीय उमेदवार न बघता मतदारांनी केवळ एका माणसाला मते दिली. मात्र त्यांची खोटी आश्वासने जनतेपुढे उघडी पडली आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत पक्षनेतृत्व स्वीकारा, पक्षाची ताकद आपली ताकद असल्याचे मत अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर शेंडे यांनी मांडले. ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.