शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

By admin | Updated: March 9, 2016 00:58 IST

वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

पालकमंत्री : वरुड, मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणीमोर्शी : वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करताना झालेले नुकसान पाहून आपल्या सर्वेक्षणात लवचिकता ठेवावी. सर्वेक्षण करून मुख्यमंत्री, कृषी व महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली.अमरावती जिल्ह्यात ६ मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मृग बहराच्या तसेच आंबिया बहराच्या संत्र्याचे मोर्शी व वरुड तालुक्यात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाहणी केली. यावेळी आ.अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, वरुडचे तहसीलदार भुसारी, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील पुरोहित, लाखारा येथील रामदास खंडार, वरुड तालुक्यातील बारगाव येथील गोपाल मानकर, बनोडा शहीद येथील पटोळे व काशीराव तिजोरे या शेतकऱ्यांच्या बागातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच रोशनखेडा येथील ६ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसामुळे बाधित झालेल्या नीलेश बारस्कर यांच्या घराचीसुद्धा पाहणी त्यांनी यावेळी केली. मृग बहराच्या संत्र्याला भाव होता. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करताना शेतकरी हा पहिलेच नुकसानीमुळे खचला आहे त्याच्या विषयी सहानुभाव ठेवून सर्वेक्षण करावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या सर्वेक्षणाचा लाभ नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळावा व कोणी सुटणार नाही याची दक्षता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी व प्रशासनाला तशी माहिती पुरवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व सांगितले की, या संकटात शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. त्यांनी खचून न जाता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.यावेळी झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन केले. (प्रतिनिधी)