शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

By admin | Updated: March 9, 2016 00:58 IST

वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

पालकमंत्री : वरुड, मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणीमोर्शी : वरुड व मोर्शी तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करताना झालेले नुकसान पाहून आपल्या सर्वेक्षणात लवचिकता ठेवावी. सर्वेक्षण करून मुख्यमंत्री, कृषी व महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली.अमरावती जिल्ह्यात ६ मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मृग बहराच्या तसेच आंबिया बहराच्या संत्र्याचे मोर्शी व वरुड तालुक्यात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाहणी केली. यावेळी आ.अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, वरुडचे तहसीलदार भुसारी, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील पुरोहित, लाखारा येथील रामदास खंडार, वरुड तालुक्यातील बारगाव येथील गोपाल मानकर, बनोडा शहीद येथील पटोळे व काशीराव तिजोरे या शेतकऱ्यांच्या बागातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच रोशनखेडा येथील ६ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसामुळे बाधित झालेल्या नीलेश बारस्कर यांच्या घराचीसुद्धा पाहणी त्यांनी यावेळी केली. मृग बहराच्या संत्र्याला भाव होता. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करताना शेतकरी हा पहिलेच नुकसानीमुळे खचला आहे त्याच्या विषयी सहानुभाव ठेवून सर्वेक्षण करावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या सर्वेक्षणाचा लाभ नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळावा व कोणी सुटणार नाही याची दक्षता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी व प्रशासनाला तशी माहिती पुरवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व सांगितले की, या संकटात शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. त्यांनी खचून न जाता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.यावेळी झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन केले. (प्रतिनिधी)