शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रिझल्ट लागला! १६,९२७ आजी, ८३८९ आजोबा परीक्षेत पास

By जितेंद्र दखने | Updated: May 6, 2024 20:55 IST

नवभारत साक्षरता अभियान : २६६ जण झाले नापास

अमरावती: नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या परीक्षेत २५ हजार ५८२ पैकी २५ हजार ३१६ आजी, आजोबा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ९२७ आजी अन् ८ हजार ३८९ आजोबांचा समावेश आहे. तर २६६ जण या परीक्षेत नापास झाले आहे. नातवंडांसोबत शिक्षणाचे धडे गिरविलेले आजी, आजोबा उत्तीर्ण झाल्याने त्यांना आता लवकरच त्यांना साक्षर झाल्याचे गुणपत्रकही दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांतून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. २०२७ पर्यत १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे ध्येय ठेवले आहे.

जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ साठी २५ हजार ५८२ निरक्षर नोंदणीचे उद्दिष्ट दिलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील साक्षरता कार्यक्रमासंबंधी टास्कनुसार हे सर्वेक्षण होते. जिल्ह्यात २०२२-२३ व २०२४ साठी उल्हास ॲपद्वारे २५ हजार ५८२ निरक्षरांची नोंदणी केलेली; तसेच त्यांना शिकविण्यासाठी २२४६ स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती. या सर्वेक्षणानंतर सर्व तालुक्यांत साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. या वर्गात शिकलेल्यांची १७ मार्च रोजी जिल्ह्यातील १६०३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात २५ हजार ३१६ आजी-आजोबा उत्तीर्ण झाले आहेत. तर २६६ जण नापास झाले आहे.

मोबाइलमुळे प्रक्रिया सुलभनवभारत साक्षरतेसाठी वर्ग सुरू झाल्यानंतर संबंधितांना साक्षरतेचे व्हिडीओ दाखविण्यात आले. त्यांच्या मोबाइलवर ते पाठविण्यात येत होते. मोबाइल क्रांतीमुळे नवभारत साक्षरतेची प्रक्रिया सुलभ झाली.-प्रीतम गणगणे,सहायक योजना अधिकारी

सप्टेंबरमध्ये होणारवाचन, लेखन व संख्याज्ञानावर प्रत्येकी ५० गुणांची ही परीक्षा होती. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४९.५ गुण आवश्यक होते. आता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापनाची दुसरी चाचणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत २६६ जण नापास झाले आहेत. यामध्ये १७५ महिला आणि ९१ पुरुषांचा समावेश आहे. या नापास झालेल्या निरक्षरांची लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.काय आहे नवभारत साक्षरता अभियान?प्राथमिक शिक्षण, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता, तसेच १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ज्यांनी शाळेत जाण्याची संधी गमावली आहे, त्यांना जीवनाची गंभीर कौशल्ये शिकविण्यासाठी २०२२ ते २०२७ या पाच वर्षांत साक्षर करण्यासाठी ‘नवभारत साक्षरता अभियान’ सुरू केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा