शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

गोपालनगर : दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी 'पॉझिटिव्ह'

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

अमरावती : स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याच श्रृखंलेत गोपालनगर परिसरातील मायानगर येथे असलेल्या देशी दारु विक्री दुकानाबाबतचा अहवाल पाठवण्यिाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तीन दिवसांपूर्वी मायानगरातील आंदोलक महिलांनी जिल्हा कचेरी गाठून देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. यावेळी महिला इमारतीवर चढल्यात. पोलीस आणि आंदोलकांमध्ये तू,तू- मै-मै झाली. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून या दारु दुकानांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे कळविले आहे. त्यानुसार एक्साईजने आंदोलक संजय गव्हाळे, संजय घरडे, जनार्दन बंड, उमेश शिरसे यांना पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळविले आहे. मायानगरातील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची नियमावली आहे. या नियमावलीच्या अधीन राहूनच प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे एक्साईजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वॉर्डातील २५ टक्के महिलांचा आक्षेप असल्यास तसा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत महिलांचा सहाभाग आवश्यक असून ‘बाटली आडवी की उभी’ त्यानंतरच दारुबंदीचा निर्णय घेतला जाईल, असे या पत्रात नमूद आहे. प्रारंभी एक्साईजचे अधिकारी मायानगर परिसराचे निरीक्षण करुन या दारु दुकानाबाबत वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. जनभावनेचा आदर ठेवूनच दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात गुप्त अहवाल कळवावा लागणार असल्याने एक्साईजचे अधिकारी कामाला लागले आहेत. हे दारु विक्रीचे दुकान गोपालनगर ते एमआयडीसी मार्गावर असून परिसरात लोकवस्ती, आजुबाजुला असलेले धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय आदींची चाचपणी केली जाणार आहे. शांतता नांदावी, यासाठी हे दारु विक्रीचे दुकान बंद करणे आवश्यक आहे किंवा नाही, याची खातरजमा एक्साईजच्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मायानगरातील महिलांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पहिला टप्पा प्रशासनाने हाती घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा असून निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग किती? यावरच देशी दारु विक्रीच्या दुकानाचे भवितव्य ठरेल, हे वास्तव आहे.