शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

‘अच्छे दिन’ची हवा गूल

By admin | Updated: August 25, 2016 00:02 IST

‘अच्छे दिन’ येणार अशी स्वप्ने दाखवित केंद्र व राज्यात सत्ता मिळविणाऱ्या भाजपचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत.

निवडणुकीसाठी सज्ज व्हा : अशोक चव्हाण यांचा काँग्रेसजनांना सल्लाअमरावती: ‘अच्छे दिन’ येणार अशी स्वप्ने दाखवित केंद्र व राज्यात सत्ता मिळविणाऱ्या भाजपचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.नागपूर महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आयोजित निवडणूकपूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी खासदार सुबोध मोहिते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ.यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, बंडू सावरबांधे, रामकिसन ओझा, शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, पुष्पाताई बोंडे, सुलभा खोडके, प्रकाश साबळे, किशोर बोरकर, संजय अकर्ते, बबलू शेखावत आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आतापासूनच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि या संस्थांवर पक्षाचा झेंडा फडकवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. सध्या भाजप शासनविरोधी वातावरण आहे. जुन्याच योजनांची नावे बदलवून विद्यमान सरकार काँग्रेसच्या योजना राबवित असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हा मुद्दा तळगाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असा सल्ला खा. अशोक चव्हाण यांनी दिला. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाभरातील तालुका, शहराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी बहुतांश पदाधिकारी व सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम चांगले सुरू असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश संपादन होईल, असा विश्वास व्यक्त केला.तत्पूर्वी दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुकाध्यक्षांकडून काँँग्रेस पक्ष संघटन व स्थानिक स्वराज्य संस्थाचे पक्ष पदाधिकारी व त्यांची कामगिरी सुद्धा जाणून घेतली. १४ तालुक्यांतील सर्व पदाधिकाऱ्यांना मंचासमोर पाचारण करून त्यांच्याकडून निवडणूकपूर्व तयारीचा आढावा काँग्रेस नेत्यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी अमरावती जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाल्लेकिला असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले जाईल. काँग्रेस पक्षाचा कुणीही पराभव करू शकत नाही. फक्त गटबाजीमुळेच पराभव होतो. त्यामुळे मतभेद बाजूला सारून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी वातावरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी आ.वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. भाजपच्या दुटप्पी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते. इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थितीआगामी निवडणुकपूर्व तयारीच्या आढावा बैठकीसाठी बुधवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या १४ तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी लक्षणीय गर्दी केली होती. विशेषत: महिला पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावून काँग्रेसमध्ये ‘महिला राज’ येण्याचे संकेत दिले. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जय्यत तयारी करण्यात आली होती, हे विशेष.