शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

बाजारपेठेत जाताय; मोबाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

अमरावती : बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसात हरविलेल्या मोबाईलबाबतच्या दररोज ...

अमरावती : बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसात हरविलेल्या मोबाईलबाबतच्या दररोज सरासरी डझनभर तक्रारी प्राप्त होतात. पोलिसांनाही मोबाईल शोधण्यास अडचणी येतात. मात्र, पोलिसांकडून अनेक मोबाईलचा शोध घेतला गेला असून, संबंधित नागरिकांना हरविलेले मोबाईल देण्यात आले. मात्र, नागरिकांनी बाजारपेठेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधान राहण्याची गरज आहे.

शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरल्याच्या आणि हरविल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याबाबत संबंधित व्यक्ती पोलीस अधीक्षक व आयुक्तालयातील सायबर सेलकडे तक्रारी करतात. काही जण ऑनलाईन पद्धतीनेदेखील तक्रारी करतात. या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेण्यात येते. संबंधित मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ट्रेस केला जातो. जर मोबाईल सुरू असेल तर मोबाईल मिळण्यास अडचण येत नाही. मात्र, मोबाईल बंद राहिल्यास त्या मोबाईलचा शोध घेण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉक्स

टक्के मोबाईलचा तपासच लागत नाही

पोलिसांना हरविलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. एखाद्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल तर त्या मोबाईलचा शोध घेताना मोठा त्रास होतो. कारण बंद मोबाईल ट्रेस होत नसल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी होते. बंद मोबाईल जर तीन किंवा चार महिन्याने तसेच वर्ष, दोन वर्षांनी जरी सुरू केला, तरी पोलिसांकडून लगेच तो मोबाईल ट्रेस करून त्याचा शोध घेतला जातो.

बॉक्स

या ठिकाणी सांभाळा मोबाईल

शहराती इतवारा बाजार, शुक्रवार बाजारासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत जाताना नागरिकांनी आपला मोबाईल सांभाळून ठेवण्याची गरज आहे. बसमध्ये प्रवास करताना तसेच बसस्थानकावर गर्दी असल्यास चोरटे याचा फायदा घेत मोबाईल लंपास करीत असल्याचे अनेकदा दिसून आले. जत्रा, मिरवणुका, राजकीय सभा, लग्नसोहळे आदी ठिकाणांवरूनही अनेकांचे महागडे मोबाईल चोरून नेल्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

बॉक्स

मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश

मोबाईल मिसिंगच्या तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त होतात. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस धडपड करीत असतात. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी, पोलीस निरीक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलच्या टीमला हरविलेले मोबाईल शोधण्यास यश आले आहे. हरविलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेत मोबाईल हस्तगत केले आहे.

बॉक्स

मोबाईल चोरी जाताच तातडीने हे करा

मोबाईल हरविला असेल किंवा चोरी गेला असेल तर सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी सिस्टीम) सुरू केले आहे. यामुळे तुमचा हरविलेला मोबाईल ट्रेस करता येतो. आयएमईआय नंबर रजिस्टर करून तो ट्रॅक करणे शक्य होते. फक्त मोबाईल ट्रॅक करता येतो. एवढेच नाही तर सीम कार्डही ब्लॉक करु शकता. मोबाईल चोरणाऱ्याने दुसरे सीम कार्ड त्यात घातले तर त्याची माहिती पोलिसांना आणि तुम्हालादेखील कळते. त्यामुळे मोबाईल परत देणे किंवा त्याचा वापर न करता तसाच टाकून देणे, हाच पर्याय त्यांच्याकडे उरतो.

कोट

मोबाईल हरविल्याच्या किंवा चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होताच सायबर सेलकडून मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ट्रेस करण्याचे काम सुरू होते. इतकेच नव्हे तर सीमकार्ड आणि मोबाईलदेखील ब्लॉक करण्याचे काम सायबर टीम करते. अनेकांचे मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, हरविलेले किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचे शोधकार्य युद्धस्तरावर सुरू आहे.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर सेल

शहर आयुक्तालय