शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत ...

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत भरलेल्या शेंगांचे पावसाने फोलपट उडाले. त्यामुळे पीक हाती येईल की नाही, अशी स्थिती झाली असल्याचे अतिवृष्टीचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे.

चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी या सात तालुक्यांमध्ये पाच दिवसांपासून वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद होत आहे. या तालुक्यांमध्ये बहुतांश शेतकरी सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतात. सोयाबीनला आता फुलोर झडून शेंगा धरल्या व त्या परिपक्व होत आहेत. लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाला तर शेंगा तोडणीस येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पाऊस नको असताना तो सातत्याने रात्री फेर धरत आहे. परिणामी शेंगांचे फोलपट उडाले आहे. काही ठिकाणी दाणा बारीक होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना उत्पादनात बसणार आहे. एवढेच नव्हे तर पावसामुळे जमिनीत पाय टाकताच चिखल होत असल्याने सोंगणीलाही बरेच दिवसांचा कालावधी द्याला लागणार आहे, तोपर्यंत पाऊस या पिकाची दाणादाण उडविणार आहे.

------------

मजुरांची चणचण

झपाट्याने शहरीकरणाकडे वळलेल्या ग्रामीण भागात आता मजुरांची चणचण आहे. त्यातच कोरोनामुळे शहरातून परतलेल्या तरुणांचे टोळके आपआपल्या थोड्याथोडक्या जमिनींमध्ये परिश्रम घेत आहेत. त्यामुळे जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

------------

हळदीलाही फटका

जिल्ह्यातील शेतकरी सर्वोत्कृष्ट दरामुळे हळद उत्पादनाकडे वळले आहेत. या पिकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सरीतील पाणी मुळाशी साचल्याने ती कुजण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळत्पाऊस न थांबल्यास हळद उत्पादनाला फटका बसेल, असे येरड बाजार येथील शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले.

---------------

पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा

अतिवृष्टीचा मारा न झालेल्या यंदा पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा केल्यानंतरही भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आठ दिवसांत सोयाबीनचे उत्पादन घरी येईल, तेही किमान कीटकनाशकाच्या वापरावर, असे पिंप्री निपाणी येथील शेतकरी अशोक डोंगरे यांनी सांगितले.

--------------

दुबार पेरणी अशक्य

अमरावती तालुक्यात आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. पेढी नदी कोपली. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन हातचे गेले आहे. आता दुबार पेरणीची वेळही राहिलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाल्याची प्रतिक्रिया रोहणखेड पर्वतापूर येथील शेतकरी सुधीर तायडे यांनी व्यक्त केली.