शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत ...

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत भरलेल्या शेंगांचे पावसाने फोलपट उडाले. त्यामुळे पीक हाती येईल की नाही, अशी स्थिती झाली असल्याचे अतिवृष्टीचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे.

चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी या सात तालुक्यांमध्ये पाच दिवसांपासून वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद होत आहे. या तालुक्यांमध्ये बहुतांश शेतकरी सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतात. सोयाबीनला आता फुलोर झडून शेंगा धरल्या व त्या परिपक्व होत आहेत. लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाला तर शेंगा तोडणीस येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पाऊस नको असताना तो सातत्याने रात्री फेर धरत आहे. परिणामी शेंगांचे फोलपट उडाले आहे. काही ठिकाणी दाणा बारीक होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना उत्पादनात बसणार आहे. एवढेच नव्हे तर पावसामुळे जमिनीत पाय टाकताच चिखल होत असल्याने सोंगणीलाही बरेच दिवसांचा कालावधी द्याला लागणार आहे, तोपर्यंत पाऊस या पिकाची दाणादाण उडविणार आहे.

------------

मजुरांची चणचण

झपाट्याने शहरीकरणाकडे वळलेल्या ग्रामीण भागात आता मजुरांची चणचण आहे. त्यातच कोरोनामुळे शहरातून परतलेल्या तरुणांचे टोळके आपआपल्या थोड्याथोडक्या जमिनींमध्ये परिश्रम घेत आहेत. त्यामुळे जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

------------

हळदीलाही फटका

जिल्ह्यातील शेतकरी सर्वोत्कृष्ट दरामुळे हळद उत्पादनाकडे वळले आहेत. या पिकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सरीतील पाणी मुळाशी साचल्याने ती कुजण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळत्पाऊस न थांबल्यास हळद उत्पादनाला फटका बसेल, असे येरड बाजार येथील शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले.

---------------

पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा

अतिवृष्टीचा मारा न झालेल्या यंदा पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा केल्यानंतरही भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आठ दिवसांत सोयाबीनचे उत्पादन घरी येईल, तेही किमान कीटकनाशकाच्या वापरावर, असे पिंप्री निपाणी येथील शेतकरी अशोक डोंगरे यांनी सांगितले.

--------------

दुबार पेरणी अशक्य

अमरावती तालुक्यात आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. पेढी नदी कोपली. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन हातचे गेले आहे. आता दुबार पेरणीची वेळही राहिलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाल्याची प्रतिक्रिया रोहणखेड पर्वतापूर येथील शेतकरी सुधीर तायडे यांनी व्यक्त केली.