शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत ...

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत भरलेल्या शेंगांचे पावसाने फोलपट उडाले. त्यामुळे पीक हाती येईल की नाही, अशी स्थिती झाली असल्याचे अतिवृष्टीचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे.

चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी या सात तालुक्यांमध्ये पाच दिवसांपासून वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद होत आहे. या तालुक्यांमध्ये बहुतांश शेतकरी सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतात. सोयाबीनला आता फुलोर झडून शेंगा धरल्या व त्या परिपक्व होत आहेत. लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाला तर शेंगा तोडणीस येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पाऊस नको असताना तो सातत्याने रात्री फेर धरत आहे. परिणामी शेंगांचे फोलपट उडाले आहे. काही ठिकाणी दाणा बारीक होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना उत्पादनात बसणार आहे. एवढेच नव्हे तर पावसामुळे जमिनीत पाय टाकताच चिखल होत असल्याने सोंगणीलाही बरेच दिवसांचा कालावधी द्याला लागणार आहे, तोपर्यंत पाऊस या पिकाची दाणादाण उडविणार आहे.

------------

मजुरांची चणचण

झपाट्याने शहरीकरणाकडे वळलेल्या ग्रामीण भागात आता मजुरांची चणचण आहे. त्यातच कोरोनामुळे शहरातून परतलेल्या तरुणांचे टोळके आपआपल्या थोड्याथोडक्या जमिनींमध्ये परिश्रम घेत आहेत. त्यामुळे जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

------------

हळदीलाही फटका

जिल्ह्यातील शेतकरी सर्वोत्कृष्ट दरामुळे हळद उत्पादनाकडे वळले आहेत. या पिकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सरीतील पाणी मुळाशी साचल्याने ती कुजण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळत्पाऊस न थांबल्यास हळद उत्पादनाला फटका बसेल, असे येरड बाजार येथील शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले.

---------------

पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा

अतिवृष्टीचा मारा न झालेल्या यंदा पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा केल्यानंतरही भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आठ दिवसांत सोयाबीनचे उत्पादन घरी येईल, तेही किमान कीटकनाशकाच्या वापरावर, असे पिंप्री निपाणी येथील शेतकरी अशोक डोंगरे यांनी सांगितले.

--------------

दुबार पेरणी अशक्य

अमरावती तालुक्यात आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. पेढी नदी कोपली. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन हातचे गेले आहे. आता दुबार पेरणीची वेळही राहिलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाल्याची प्रतिक्रिया रोहणखेड पर्वतापूर येथील शेतकरी सुधीर तायडे यांनी व्यक्त केली.