शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बीटींचा आम्हाला आशीर्वाद !

By admin | Updated: January 16, 2017 00:07 IST

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, ...

संजय खोडके : पत्रपरिषदेतून व्यक्त केला विश्वास, काँग्रेसची वाटचाल सुकर अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बी.टी. देशमुखांचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संजय खोडके यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केला. काँग्रेसच्यावतीने पदवीधर मतदार संघातून १७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमिवर खोडके यांनी पत्रपरिषदेतून भूमिका माडली. संजय खोडके यांनी समविचारी पक्ष, संघटनांच्या पाठिंब्यावर पदवीधर निवडणूक काबीज करणार असल्याचा दावा केला. राज्यातील भाजपचे सरकार हे शिक्षक-पदवीधरांच्या अहिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळेच औरंगाबाद येथे न्याय मागण्यास गेलेल्या शिक्षकांवर लाठीहल्ला करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पहिल्यांदाच लढवीत आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात नोंदणी झालेल्या पदवीधर मतदारांच्या आकडेवारीनुसार ही निवडणूक कठीण नाही, असे खोडके म्हणाले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी नामांकन अर्ज सादर करताना उपस्थित राहतील. त्यानुसार नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. थेट अनुशेषाच्या मुद्यावर बोट ठेवताना संजय खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अनुशेषाचा प्रश्न विसरले आहेत. बी.टी. देशमुखांनी विधानपरिषदेत सर्वच बाबींचा अनुशेष दूर करण्यासाठी लढाई लढली. मात्र, त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांनी अनुशेषाचा मुद्दा गुंडाळून ठेवल्याचा आरोप संजय खोडके यांनी केला. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात पदवीधर बेरोजगांचे प्रश्न, अनुशेष, शिक्षकांचे प्रश्न व समस्या आदींचा समावेश राहील, असे ते म्हणाले. बी. टी. देशमुखांनी ‘पदवीधर’च्या निवडणुकीसाठी आम्हाला आशीर्वाद दिला असून अधिकृत पाठिंब्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. 'नुटा' ही पदवीधरांची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. मात्र, बीटींचा आम्हाला आशीर्वाद आहे, असा दावा खोडके यांनी केला आहे. पत्रपरिषदेला महापौर चरणजित कौर नंदा, संगीता शिंदे, माजी आमदार सुलभा खोडके, भोजराज काळे, गाजी जहरोश, दिलीप कडू, नितीन चव्हाळे, ललित चौधरी, दादाराव टवलारे, विकास दवे, शरद तिरमारे, संजय आसोले, बुरघाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)