शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

जलसंधारणातून गावाच्या कायापालटचे ध्येय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:47 IST

पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसंदर्भात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले. तालुका प्रशासनाने या कामांसाठी भरीव प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पानी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाकडून धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सहभागी गावांत कामे सुरू आहेत. स्पर्धेसाठी ३३४ गावांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले आहे. या गावांतील नियोजन व अडचणींबाबत प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री, मनपा आयुक्त हेमंत पवार, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, बाबासाहेब राऊत, फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे आदी उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी गावांत गत पंधरवड्यात जलसंधारणाची कामे सुरू झाली. उर्वरित एका महिन्याच्या कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवत प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत. सहभागी गावांकडून अपेक्षित काम व खचार्बाबत अर्ज येताच उपविभागीय अधिकाºयांनी त्याला तात्काळ मान्यता द्यावी. स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता कामे गतीने व्हावीत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन तेथील मजुरांना मनरेगा अंतर्गत वेतन दिले जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.भारतीय जैन संघटना देणार यंत्रसामग्रीधारणी तालुक्यासाठी खंडवा व बऱ्हाणपूर येथून यंत्रे मागविण्यात आली आहेत. प्रत्येक गावाला जेसीबी, पोकलॅन आदी यंत्रसामग्री पुरविण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या गावात चांगले काम होत असेल, तर केवळ गुणांच्या तांत्रिकतेत न अडकता तिथे यंत्र दिले जाईल, असी ग्वाही भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन जैन यांनी दिली. गावात झालेल्या प्रत्येक कामाची नोंद अ‍ॅपमध्ये घ्यावी, अशी सूचना उपल्हिाधिकारी काळे यांनी केलीस्पर्धेचा ४५ दिवस राहणार कालावधीवॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यंदाचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक तसेच प्रत्येक तालुक्यातील आघाडीवरील गावाला प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत श्रमदान तसेच यंत्रांच्या साहाय्याने जलसंधारणाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.