शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

मानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित

वैभव बाबरेकर - अमरावतीमानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बुद्धीला आव्हान देणारी अनेक संशोधने सामान्यजनांसाठी सादर करण्यात आलीत. देशभरातील विविध राज्यांतून २१६ संशोधकांनी विज्ञानाचे विविध अविष्कार अंबानगरीत उलगडून दाखविले. ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषेदेचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या परिषदेला देशभरातील ९ राज्यांतून २१६ संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी १७२ संशोधकांनी रासायनिक प्रक्रियेवर आधारीत संशोधनांचे सादरीकरण केले. मानवी जीवनासाठी उपयोगी पडणारे पर्यावरणपूरक संशोधन दर्जेदार व स्वस्त किमतीत मानवाच्या कामी पडणारे आहे. मानवी जीवनातील अडीअडचणी लक्षात घेता संशोधकांनी तयार केलेली स्वस्त व दर्जेदार औषधीही यावेळी सादर करण्यात आलीत. ३५ वर्षांखालील वयोगटातील १६ विद्यार्थ्यांनी संशोधनाचे 'ओरल प्रेझेंनटेशन' केले. शनिवारी सकाळच्या सत्रात मुंबई येथील आयआयटीमधील संशोधक अरिधम चौधरी, लखनौचे अभिनव कुमार, दिल्लीचे प्रवीण इंगोले, वाराणसी येथील बनारस हिन्दू विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक सेन गुप्ता व अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे के.एस.चिखालीया यांनी आपापल्या विभागातील अविष्कारांचे सादरीकरण केले. २१० संशोधकांनी पोस्टरचे प्रदर्शन केले. देशभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या संशोधनकार्यामुळे अंबानगरीतील जिज्ञासू तरुणांना नवी उर्जा प्राप्त झाली.