शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

मानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित

वैभव बाबरेकर - अमरावतीमानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बुद्धीला आव्हान देणारी अनेक संशोधने सामान्यजनांसाठी सादर करण्यात आलीत. देशभरातील विविध राज्यांतून २१६ संशोधकांनी विज्ञानाचे विविध अविष्कार अंबानगरीत उलगडून दाखविले. ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषेदेचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या परिषदेला देशभरातील ९ राज्यांतून २१६ संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी १७२ संशोधकांनी रासायनिक प्रक्रियेवर आधारीत संशोधनांचे सादरीकरण केले. मानवी जीवनासाठी उपयोगी पडणारे पर्यावरणपूरक संशोधन दर्जेदार व स्वस्त किमतीत मानवाच्या कामी पडणारे आहे. मानवी जीवनातील अडीअडचणी लक्षात घेता संशोधकांनी तयार केलेली स्वस्त व दर्जेदार औषधीही यावेळी सादर करण्यात आलीत. ३५ वर्षांखालील वयोगटातील १६ विद्यार्थ्यांनी संशोधनाचे 'ओरल प्रेझेंनटेशन' केले. शनिवारी सकाळच्या सत्रात मुंबई येथील आयआयटीमधील संशोधक अरिधम चौधरी, लखनौचे अभिनव कुमार, दिल्लीचे प्रवीण इंगोले, वाराणसी येथील बनारस हिन्दू विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक सेन गुप्ता व अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे के.एस.चिखालीया यांनी आपापल्या विभागातील अविष्कारांचे सादरीकरण केले. २१० संशोधकांनी पोस्टरचे प्रदर्शन केले. देशभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या संशोधनकार्यामुळे अंबानगरीतील जिज्ञासू तरुणांना नवी उर्जा प्राप्त झाली.