शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

चार राजकीय पक्षांवर गंडांतर

By admin | Updated: November 25, 2015 00:53 IST

राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत २८० राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस पाठविली आहेत.

आमदारांचे पक्ष : नोंदणी रद्द होणार, राज्यभरात २८० राजकीय पक्षांना नोटीस लोकमत विशेषअमरावती : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत २८० राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस पाठविली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांच्या राजकीय पक्षांसह इतरही नोंदणीकृत पक्षांचा समावेश आहे.या पक्षांनी ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे संबंधित पक्षप्रमुखांना राज्य निवडणूक आयुक्तांनी कळविले आहे. यात रिपाइंसह शेकाप, भारिप-बमंस, रासप यांच्यासह विविध स्थानिक आघाड्यांचा समावेश आहे. अमरावतीत सात पक्षांना नोटीसअमरावती जिल्ह्यातील नगर सुधार आघाडी, प्रहार पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस, विदर्भ जनसंग्राम, जनविकास काँग्रेस, वरूड विकास आघाडी आणि अमरावती जनकल्याण आघाडीचा समावेश आहे. यातील प्रहार पक्षाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसचे नेतृत्व आ. रवी राणा, विदर्भ जनसंग्रामचे आ. अनिल बोंडे तर जनविकास काँग्रेसची धुरा आ. सुनील देशमुखांकडे आहे. महापालिका निवडणुकीचे वेळी सुनील देशमुख आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी अनुक्रमे जनविकास काँग्रेस आणि जनकल्याण आघाडीची मुहूर्तमेढ रोवली होती तर भाजपवासी होण्यासाठी अपक्ष आमदार असलेल्या अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका विदर्भ जनसंग्रामच्या बॅनरवर लढवल्या होत्या, तर आ. रवी राणा हेसुद्धा आपल्या समर्थकांना महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस आणि आ. बच्चू कडू हे प्रहारतर्फे रिंगणात असतात. आ. बच्चू कडू प्रणित प्रहार पक्षाचे जिल्हा परिषद तथा नगरपालिकेमध्ये सदस्य सुद्धा आहेत.कालपरत्वे सुनील देशमुख आणि अनिल बोंडे भाजपवासी झाल्याने त्यांच्या नेतृत्वातील जनविकास काँग्रेस आणि विदर्भ जनसंग्राम संघटना या कागदावरच आहेत. मात्र महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे निवडून आलेले सदस्यांची नोंदणी या पक्षाच्या नावावर आहे. ३१ डिसेंबर नंतर पक्षाची नोंदणी रद्द झाल्यास त्या सदस्याच्या सदस्यत्वावर गंडांतर येऊ शकते. आ. रवी राणा आणि आ. बच्चू कडू यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस आणि प्रहारचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य आहेत. याशिवाय माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या नेतृत्वातील जनकल्याण आघाडीकडेसुद्धा एकमेव महिला नगरसेविका आहे. नव्या वर्षापूर्वी कागदपत्रे सादर न केल्यास पक्षनोंदणी रद्द होईल व त्या पक्षांवर निवडून आलेले सदस्यांवरसुद्धा अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यास राज्यातील २८० राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे, असे आदेश काढले असताना त्या पक्षावर निवडून आलेल्या सदस्यांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी नोंदणी रद्द झाल्यास संबंधित सदस्यांच्या सदस्यत्वावर गंडांतर येऊ शकते, अशी भीती राजकीय धुरिणांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)