शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार राजकीय पक्षांवर गंडांतर

By admin | Updated: November 25, 2015 00:53 IST

राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत २८० राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस पाठविली आहेत.

आमदारांचे पक्ष : नोंदणी रद्द होणार, राज्यभरात २८० राजकीय पक्षांना नोटीस लोकमत विशेषअमरावती : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत २८० राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस पाठविली आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांच्या राजकीय पक्षांसह इतरही नोंदणीकृत पक्षांचा समावेश आहे.या पक्षांनी ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे संबंधित पक्षप्रमुखांना राज्य निवडणूक आयुक्तांनी कळविले आहे. यात रिपाइंसह शेकाप, भारिप-बमंस, रासप यांच्यासह विविध स्थानिक आघाड्यांचा समावेश आहे. अमरावतीत सात पक्षांना नोटीसअमरावती जिल्ह्यातील नगर सुधार आघाडी, प्रहार पक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस, विदर्भ जनसंग्राम, जनविकास काँग्रेस, वरूड विकास आघाडी आणि अमरावती जनकल्याण आघाडीचा समावेश आहे. यातील प्रहार पक्षाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसचे नेतृत्व आ. रवी राणा, विदर्भ जनसंग्रामचे आ. अनिल बोंडे तर जनविकास काँग्रेसची धुरा आ. सुनील देशमुखांकडे आहे. महापालिका निवडणुकीचे वेळी सुनील देशमुख आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी अनुक्रमे जनविकास काँग्रेस आणि जनकल्याण आघाडीची मुहूर्तमेढ रोवली होती तर भाजपवासी होण्यासाठी अपक्ष आमदार असलेल्या अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका विदर्भ जनसंग्रामच्या बॅनरवर लढवल्या होत्या, तर आ. रवी राणा हेसुद्धा आपल्या समर्थकांना महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस आणि आ. बच्चू कडू हे प्रहारतर्फे रिंगणात असतात. आ. बच्चू कडू प्रणित प्रहार पक्षाचे जिल्हा परिषद तथा नगरपालिकेमध्ये सदस्य सुद्धा आहेत.कालपरत्वे सुनील देशमुख आणि अनिल बोंडे भाजपवासी झाल्याने त्यांच्या नेतृत्वातील जनविकास काँग्रेस आणि विदर्भ जनसंग्राम संघटना या कागदावरच आहेत. मात्र महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे निवडून आलेले सदस्यांची नोंदणी या पक्षाच्या नावावर आहे. ३१ डिसेंबर नंतर पक्षाची नोंदणी रद्द झाल्यास त्या सदस्याच्या सदस्यत्वावर गंडांतर येऊ शकते. आ. रवी राणा आणि आ. बच्चू कडू यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस आणि प्रहारचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य आहेत. याशिवाय माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या नेतृत्वातील जनकल्याण आघाडीकडेसुद्धा एकमेव महिला नगरसेविका आहे. नव्या वर्षापूर्वी कागदपत्रे सादर न केल्यास पक्षनोंदणी रद्द होईल व त्या पक्षांवर निवडून आलेले सदस्यांवरसुद्धा अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यास राज्यातील २८० राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे, असे आदेश काढले असताना त्या पक्षावर निवडून आलेल्या सदस्यांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी नोंदणी रद्द झाल्यास संबंधित सदस्यांच्या सदस्यत्वावर गंडांतर येऊ शकते, अशी भीती राजकीय धुरिणांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)