शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विशेष योजनेतील अनुदानावर गंडांतर

By admin | Updated: May 7, 2017 00:07 IST

१ मेपर्यंत जी शहरे हगणदारीमुक्त झाली नाहीत, त्या शहरांना राज्य शासनाच्या विशेष योजनेमधून अनुदान देण्यात येणार नाही, ....

स्वच्छ भारत अभियान : शहर हागणदारीमुक्त न झाल्याचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ मेपर्यंत जी शहरे हगणदारीमुक्त झाली नाहीत, त्या शहरांना राज्य शासनाच्या विशेष योजनेमधून अनुदान देण्यात येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यस्तरीय समितीने शहर हागणदारीमुक्त (ओडीएफ) संदर्भात नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावती महापालिकेसोबत अनुदानाच्या निर्णयावर संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेने ३१ मार्चलाच शहर हागणदारीमुक्त घोषित केले होते. मात्र राज्यस्तरीय तपासणी पथकाने तो दावा खोडून काढल्याने १ मे २०१७ नंतर राज्य शासनाच्या विशेष योजनांमधील अनुदान देण्यात येणार नाहीत. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी हागणदारीमुक्त घोषित झाले असले तरी १ मे २०१७ नंतर ओडीएफ न होणाऱ्या शहरांना राज्य शासनाच्या विशेष योजनांमधून अनुदान दिले जाणार नाही, या २ मार्चच्या शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान डिसेंबर २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांना २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त (ओडीएफ) करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या अनुषंगाने वैयक्तिक शौचालये तसेच सामुदायिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुरेसा निधी राज्य शासनाने मंजूर केला होता. या व्यतिरिक्त विविध बैठका, कार्यशाळा, प्रबोधनपर कार्यक्रमाद्वारे या शहरांनी हागणदारीमुक्तसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते. हागणदारी मुक्त (ओडीएफ) झालेल्या शहरांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. सदर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन हागणदारीमुक्त झालेल्या शहरांना त्यांच्या वर्गवारीनुसार रुपये २ कोटी, १.५ कोटी व १ कोटी रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भांकित क्र. ४ येथील दि. २८ मार्च २०१६ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता व या अनुदानाचे प्रत्यक्ष वितरण देखील करण्यात आलेले आहे. अशा विविध उपाययोजना सातत्याने दोन वर्षे राबविल्यानंतरही या राष्ट्रीय कार्यक्रमातील हागणदारीमुक्तीचे (ओडीएफ) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही शहरे पुरेसे प्रयत्न करीत नाहीत/प्रयत्न करण्यात उदासिनता दाखवित आहेत आणि परिणामी हागणदारीमुक्त झाली नाहीत. त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने २ मार्च रोजी शासन निर्णय काढला आहे. सर्वसाधारणपणे राज्यातील सर्व शहरांना ३१ मार्च २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याबाबतचे उद्दिष्ट देण्यात आले होते.असा आहे निर्णय१ मे २०१७ पर्यंत जी शहरे हागणदारीमुक्त (ओडीएफ) होणार नाहीत अशा शहरांना १ मे २०१७ नंतर राज्य शासनाच्या विविध विशेष योजनांमधील अनुदान देण्यात येणार नाही.अशा विशेष अनुदानाच्या योजनांमध्ये शासनाच्या, महानगरपालिका पायाभूत, महानगरपालिका हद्दवाढ, रस्ते अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरपालिका हद्दवाढ, नवीन नगरपरिषदा, नवीन नगरपंचायती या विशेष योजनेमधून कोणतेही अनुदान मंजूर करण्यात येणार नाही. तसेच अशा शहरांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गंत कोणतेही नवीन प्रकल्पदेखील मंजूर करण्यात येणार नाहीत. असे अनुदान, असे शहर पूर्णत: हागणदारीमुक्त होईपर्यंत दिले जाणार नाही.