शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

शेती उत्पादक कंपन्यांना एमआयडीसीमध्ये जागा देणार

By admin | Updated: January 28, 2016 00:14 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या विशेषत: आत्महत्याग्रस्त भागाकरिता सवोर्तोपरी सहाय्य करण्याचे शासनाचे धोरण आहे.

पालकमंत्री : डॉ.पंजाबराव देशमुख प्रशिक्षण सभागृहात आयोजनअमरावती : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या विशेषत: आत्महत्याग्रस्त भागाकरिता सवोर्तोपरी सहाय्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. अमरावती जिल्ह्यात स्थापित झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेला माल सहजपणे विकता यावा, मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषक प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात जागतिक बँक, आत्माच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व त्याअंतर्गत स्थापित शेतकरी गटांसाठीच्या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहसंचालक सु.रा. सरदार होते. नाबार्डचे पवणीकर, वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद घन, माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले आदी उपस्थित होते.यावेळी ना. पोटे म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने मोठे होण्याचे स्वप्न निश्चित पहावे. शेतकरी आपल्या पायावर उभा झालाच पाहिजे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेले उद्योग आहे. संघर्षातूनच माणूस मोठा होतो, असे सांगून ते म्हणाले, सीड्स कंपन्यांनी मागील काळात शेतकऱ्यांची फसवणूक केली. बीज उत्पादन प्रक्रिया उद्योगात मोठा वाव आहे. फुड प्रोसेसिंगची नेमकी प्रक्रिया समजून घ्यावी त्याचा पुर्ण अभ्यास करुन प्रकल्प सुरू करावा. उद्योग उभारण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. जिल्ह्यात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्र्यांनी कार्यशाळेत सांगितले.प्रारंभी कृषी सहसंचालक सु.रा.सरदार, माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले, आत्मा चे प्रकल्प संचालक रवीन्द्र जाधव यांनी जागतिक बँक अर्थसाहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्ष्म कृषि विकास प्रकल्पा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व स्थापन झालेल्या गटांची माहिती दिली. आत्मा चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाबतीवाले म्हणाले, जिल्ह्यात ३३०० जादा गट स्थापन असून ५४००० शेतकरी या गटाशी जोडल्या गेले आहेत.१२०० गट आत्मा तुन कमी केले आहेत. १२०० फाईल्स अद्यावत करण्यात आले आहेत.५४ गटांनी प्रत्यक्ष व्यवसायाला सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)