शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जिल्हा परिषदेचा यशवंत पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:42 IST

पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देयशवंत पंचायतराज : राज्यपाल, ग्रामविकासमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिक जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी राज्यस्तरीय केली होती.यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. याशिवाय विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय गौरव सोहळा शुक्रवार २६ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील रवींद्र नाटय मंदीर येथे पार पडला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे, ग्रामविकास विभागाचे सचिव व अन्य मान्यवरांचे हस्ते जिल्हा परिषदेला १५ लाखांचा तृतीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे तसेच माजी अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे , सदस्य सारंग खोडस्कर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके,प्रकल्प संचालक आनंद भंडारी आदीचा गौरव करण्यात आला.या अभियानात जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी केली होती. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा त्यात समावेश होता.तसेच २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागात केलेले संगणकीकरण, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान,स्वच्छता अभियान यासारख्या योजनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.यासर्व नाविण्यपूर्ण उपक्रमाची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.त्यामुळेच राज्यात जिल्हा परिषदेला हा सन्मान मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी व अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.