शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जिल्हा परिषदेचा यशवंत पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:42 IST

पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देयशवंत पंचायतराज : राज्यपाल, ग्रामविकासमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिक जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी राज्यस्तरीय केली होती.यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. याशिवाय विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय गौरव सोहळा शुक्रवार २६ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील रवींद्र नाटय मंदीर येथे पार पडला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे, ग्रामविकास विभागाचे सचिव व अन्य मान्यवरांचे हस्ते जिल्हा परिषदेला १५ लाखांचा तृतीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे तसेच माजी अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे , सदस्य सारंग खोडस्कर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके,प्रकल्प संचालक आनंद भंडारी आदीचा गौरव करण्यात आला.या अभियानात जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी केली होती. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा त्यात समावेश होता.तसेच २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागात केलेले संगणकीकरण, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान,स्वच्छता अभियान यासारख्या योजनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.यासर्व नाविण्यपूर्ण उपक्रमाची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.त्यामुळेच राज्यात जिल्हा परिषदेला हा सन्मान मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी व अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.