शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:06 IST

खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देराष्ट्रपित्याला दीडशेव्या जयंतीला नमन चरख्यावर १० तास सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.शहरातील जिल्हा उद्योग कार्यालय परिसरात सकाळी ८ वाजता सूत कताई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांनी येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. पालकमंत्र्यांनी चरख्यावर सूतकताई केली. येथे हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा असे सुमारे ५० प्रकारचे चरखे होते. या महोत्सवाला मूर्त रूप देण्यासाठी कस्तुरबा समिती आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले. सूतक ताई महोत्सवात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर प्रामुख्याने उपस्थित होेते.चरख्याला मिळाले सौरऊर्जेचे बळराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशकाळात विदेशी वस्तू, साहित्य वापरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. स्वदेशी हा मूलमंत्र देताना गांधीजींनी चरख्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. हातचरखा याला आजही गांधी चरखा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर गांधीजींनी पेटी चरख्याची संकल्पना साकारली, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने हाताळता येईल. १९६० च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर सौरऊर्जेचे बळ मिळून सौर चरखा अस्तित्वात आला. आज गाव-खेड्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून चरख्याद्वारे सूतकताई आणि वस्त्रनिर्मितीचे दालन उभे झाले आहे. खादी वस्त्रांना महानगरातही मागणी वाढली असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.