शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:06 IST

खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देराष्ट्रपित्याला दीडशेव्या जयंतीला नमन चरख्यावर १० तास सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.शहरातील जिल्हा उद्योग कार्यालय परिसरात सकाळी ८ वाजता सूत कताई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांनी येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. पालकमंत्र्यांनी चरख्यावर सूतकताई केली. येथे हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा असे सुमारे ५० प्रकारचे चरखे होते. या महोत्सवाला मूर्त रूप देण्यासाठी कस्तुरबा समिती आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले. सूतक ताई महोत्सवात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर प्रामुख्याने उपस्थित होेते.चरख्याला मिळाले सौरऊर्जेचे बळराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशकाळात विदेशी वस्तू, साहित्य वापरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. स्वदेशी हा मूलमंत्र देताना गांधीजींनी चरख्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. हातचरखा याला आजही गांधी चरखा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर गांधीजींनी पेटी चरख्याची संकल्पना साकारली, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने हाताळता येईल. १९६० च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर सौरऊर्जेचे बळ मिळून सौर चरखा अस्तित्वात आला. आज गाव-खेड्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून चरख्याद्वारे सूतकताई आणि वस्त्रनिर्मितीचे दालन उभे झाले आहे. खादी वस्त्रांना महानगरातही मागणी वाढली असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.