शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:06 IST

खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देराष्ट्रपित्याला दीडशेव्या जयंतीला नमन चरख्यावर १० तास सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरांजली अर्पण केली.शहरातील जिल्हा उद्योग कार्यालय परिसरात सकाळी ८ वाजता सूत कताई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ यांनी येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. पालकमंत्र्यांनी चरख्यावर सूतकताई केली. येथे हात चरखा, पेटी चरखा, अंबर चरखा असे सुमारे ५० प्रकारचे चरखे होते. या महोत्सवाला मूर्त रूप देण्यासाठी कस्तुरबा समिती आणि शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले. सूतक ताई महोत्सवात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक नीलेश निकम, एमसीईडीचे विभागीय अधिकारी अभिराम डबीर प्रामुख्याने उपस्थित होेते.चरख्याला मिळाले सौरऊर्जेचे बळराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशकाळात विदेशी वस्तू, साहित्य वापरावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. स्वदेशी हा मूलमंत्र देताना गांधीजींनी चरख्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. हातचरखा याला आजही गांधी चरखा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर गांधीजींनी पेटी चरख्याची संकल्पना साकारली, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने हाताळता येईल. १९६० च्या सुमारास अंबर चरखा अस्तित्वात आला. ही आताच्या सोलर चरख्याची पहिली पायरी होती. नंतर सौरऊर्जेचे बळ मिळून सौर चरखा अस्तित्वात आला. आज गाव-खेड्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून चरख्याद्वारे सूतकताई आणि वस्त्रनिर्मितीचे दालन उभे झाले आहे. खादी वस्त्रांना महानगरातही मागणी वाढली असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.