शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव अन् भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:56 IST

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे,

ठळक मुद्देभारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवार, २७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सभेत पारित केले.भाऊसाहेबांच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सभेत शहर काँग्रेस कमिटीने महत्त्वाचे ठराव घेतले. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने चौबळ वाडा येथील पक्ष कार्यालयात सर्वप्रथम भाऊसाहेबांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.किशोर बोरकर यांनी आपल्या मनोगतातून राज्यघटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात यावे, बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, भाजपक्षाचे राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी देशाचे संविधान बदलविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे ठराव मांडले. वरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.सभेला उपस्थित आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख म्हणाले की, डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम करताना देशभरातील शेतकºयांना न्याय दिला. याशिवाय शिक्षणक्षेत्रात एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असताना भाऊसाहेबांनी त्या काळात वाङ्मयात पीएच.डी. करून प्रस्थापितांना आपल्या बुद्धिचातुर्याचा परिचय दिला. गोरगरीब, उपेक्षित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यात बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित केल्याचे ते म्हणाले.यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, भय्यासाहेब निचल, अर्चना सवाई, अखिल भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस भैया पवार, आसिफ मंसुरी, बाबर कुरेशी, ऋषिराज मेटकर, अभिनंदन पेंढारी, यासीर भारती, संकेत कुलट, संकेत बोके, भाऊराव पोटे, निसार अहमद मंसुरी, नदीम मुल्ला, वंदना थोरात, अनिला काझी, कुंदा अनासाने, हसिना शाह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन दीपक हुंडीकर यांनी केले. आभार प्रदर्शन नसीम खान यांनी केले.