शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव अन् भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:56 IST

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे,

ठळक मुद्देभारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अफाट कार्य व सर्वज्ञ क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान पाहता, शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे व बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवार, २७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सभेत पारित केले.भाऊसाहेबांच्या ११९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सभेत शहर काँग्रेस कमिटीने महत्त्वाचे ठराव घेतले. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने चौबळ वाडा येथील पक्ष कार्यालयात सर्वप्रथम भाऊसाहेबांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.किशोर बोरकर यांनी आपल्या मनोगतातून राज्यघटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात यावे, बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, भाजपक्षाचे राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी देशाचे संविधान बदलविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करणारे ठराव मांडले. वरील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.सभेला उपस्थित आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख म्हणाले की, डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम करताना देशभरातील शेतकºयांना न्याय दिला. याशिवाय शिक्षणक्षेत्रात एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असताना भाऊसाहेबांनी त्या काळात वाङ्मयात पीएच.डी. करून प्रस्थापितांना आपल्या बुद्धिचातुर्याचा परिचय दिला. गोरगरीब, उपेक्षित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यात बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना संघटित केल्याचे ते म्हणाले.यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, भय्यासाहेब निचल, अर्चना सवाई, अखिल भारतीय युवक काँग्रेस सरचिटणीस भैया पवार, आसिफ मंसुरी, बाबर कुरेशी, ऋषिराज मेटकर, अभिनंदन पेंढारी, यासीर भारती, संकेत कुलट, संकेत बोके, भाऊराव पोटे, निसार अहमद मंसुरी, नदीम मुल्ला, वंदना थोरात, अनिला काझी, कुंदा अनासाने, हसिना शाह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन दीपक हुंडीकर यांनी केले. आभार प्रदर्शन नसीम खान यांनी केले.