शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

जिल्ह्यात उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार द्या

By admin | Updated: April 15, 2015 00:17 IST

जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा,..

मागणी : यशोमती ठाकूर यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनअमरावती : जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनासाठी अमरावतीत आले असता आ. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जिल्ह्यामधील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रांकडून विशेष प्रोत्साहने आणि सवलतीचा लाभ घेतला आहे. अशा उद्योगांमध्ये पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणीत ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र येथे पाहायला मिळत नाही. स्थानिक उमेदवारांना नोकरीत डावलेले जाते. आपल्या मतदारसंघातील नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये रतन पॉवर इंडिया, टेक्सस्टाईल उद्योग सुरू आहे. तसेच अनेक उद्योग येथे प्रस्तावित आहे. एमआयडीसीसाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली असल्याने या उद्योगांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पदवीधर, कुशल व अकुशल युवकांना तसेच अन्य स्थानिकांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरीमध्ये शासन निर्णयानुसार सामावून घेण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. रतन पॉवर इंडिया प्रकल्पाने स्थानिक उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा केल्यास येथील औद्योगिक विकास साधला जावू शकतो. त्यादृष्टीने कारवाई करण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली. एमआयडीसीमध्ये रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.खरिपापाठोपाठ रबीही बुडालाअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी विधान भवनात औचित्याचा मुद्दा मांडताना केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बी हंगामात पेरणी केली. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे.