शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

जिल्ह्यात उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार द्या

By admin | Updated: April 15, 2015 00:17 IST

जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा,..

मागणी : यशोमती ठाकूर यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनअमरावती : जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनासाठी अमरावतीत आले असता आ. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जिल्ह्यामधील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रांकडून विशेष प्रोत्साहने आणि सवलतीचा लाभ घेतला आहे. अशा उद्योगांमध्ये पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणीत ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र येथे पाहायला मिळत नाही. स्थानिक उमेदवारांना नोकरीत डावलेले जाते. आपल्या मतदारसंघातील नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये रतन पॉवर इंडिया, टेक्सस्टाईल उद्योग सुरू आहे. तसेच अनेक उद्योग येथे प्रस्तावित आहे. एमआयडीसीसाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली असल्याने या उद्योगांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पदवीधर, कुशल व अकुशल युवकांना तसेच अन्य स्थानिकांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरीमध्ये शासन निर्णयानुसार सामावून घेण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. रतन पॉवर इंडिया प्रकल्पाने स्थानिक उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा केल्यास येथील औद्योगिक विकास साधला जावू शकतो. त्यादृष्टीने कारवाई करण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली. एमआयडीसीमध्ये रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.खरिपापाठोपाठ रबीही बुडालाअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी विधान भवनात औचित्याचा मुद्दा मांडताना केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बी हंगामात पेरणी केली. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे.